Thursday 22 December 2011

रस्‍ते अपघातांची आपत्‍ती ....!

वाहनांचा अपघात ही मानव निर्मित आपत्‍ती आहे. छोट्या बाबी आपण लक्षात घेतल्‍या आणि त्‍यावर अंमलबजावणी सुरु केली तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकतो.                        
आपल्‍या आसपासच्‍या परिसरात कोणकोणत्‍या प्रकारची आपत्‍ती येवू शकते याप्रती आपण सजग राहणे तसेच आपण त्‍या आपत्‍तीतून सुटका करुन घेण्‍याची पूर्वतयारी करणे त्‍याचा सराव करणे व आलेल्‍या आपत्‍तीत प्रत्‍यक्ष काम करणे म्‍हणजे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन होय.
     काही आपत्‍ती आपण टाळू शकतो याची जाणीव आपणास हवी रस्‍त्‍यांवर होणारे अपघात आणि त्‍यात होणारी प्राण व वित्‍तहानी टाळता येते. यासाठी आपण वाहन सुस्थितीत आहे की नाही याची मुळात तपासणी धरुन निघतानाच करावी. वाहनाला ब्रेक व्‍यवस्थित आहे याची खात्री केल्‍याशिवाय वाहन रस्‍त्‍यावर नेऊ नये.
     रस्‍त्‍यावर चारचाकी वाहनात असाल तर आपण सिटबेल्‍ट जरुर लावला पाहिजे. चुकून अपघात झाल्‍याच्‍या  स्थितीत आपल्‍या सुरक्षिततेसाठी ते आवश्‍यक असते. दुचाकी वाहनातही आपण ब्रेक-इंडीकेटर यांची तपासणी व सुयोग्‍य वापर याकडे लक्ष द्यायला हवे. दुचाकी वाहन धारकांनी हेल्‍मेट जरुन वापरावे. यामुळे अपघाताच्‍या स्थितीत प्राणहानीचा धोका टळतो.
     अपघाताला मुख्‍यत्‍वे मानवी चुकाच कारणीभूत ठरत असतात. यात चुकीच्‍या पध्‍दती ओव्‍हरटेक करणे, इंडीकेटर न दाखवता वाहन अचानक वळविणे या खेरीज अति गतीने वाहन चालविणे ही अपघातांची मुख्‍य कारणे आहेत. वाहनाच्‍या  गतीमुळे झालेल्‍या अपघातांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
     वळणे असलेल्‍या रस्‍त्‍यावर वेगात वाहन वळते त्‍यावेळी ते दुस-या बाजूला ओढले जाते. जितकी गती अधिक तितके ओढले जाण्‍याचे प्रमाण अधिक त्‍यामुळे घाटांमध्‍ये अनेकदा अपघात होतात.
     छोट्या छोट्या बाबींमधून आपण अपघाताची ही आपत्‍ती दूर ठेवू शकतो आणि आपण ती ठेवायलाच पाहिजे.
                                     - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment