वर्धा,दि.19- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत अत्यावश्यक गरजुनुरुप गावपातळीपासूनचे नियेाजन व विस्तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात कृषि मित्रांची नेमणूक करावयाची आहे. कृषि मित्र हा शेतीतील कौशल्य सिध्द केले असून, कृषि विस्तार येाजना व गाव, खेडे यातील महत्वाचा दुवा असेल. कृषि मित्राचे किमान शिक्षण माध्यमीक अथवा उच्च माध्यमीक स्तरावरील असावे. कृषि मित्राला शेतकरी संघटन, शेतकरी समुह तयार करणे, गांव पातळीवरील माहितीबाबत विषय विशेषज्ञ यांचेशी संपर्कात राहणे ग्रामसभेस हजर राहणे, प्रसार माध्यमाच्या मदतीने माहिती देणे, आधुनिक शेतीचा प्रसार करणे, तसेच कृषि विभागामार्फत सांगितलेली कामे इ. कामे करावयाची आहे.
निवड झालेल्या कृषि मित्रांना वार्षीक रु. 4000 चे मानधन देण्यात येणार असुन दैनिक अॅग्रोवणचा पुरवठा तसेच कृषि विषयक माहिती देण्यात येणार आहे.
कृषि मित्राच्या नेमणुकीसाठीचा अर्ज संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडे आठ दिवसाच्या आत करावयाचा असुन उपविभागीय स्तरावरील समिती मार्फत दोन गावाकरीता एक याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कृषि मित्राची निवड करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment