वर्धा, दि.30- कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. सदर बैठकीचे औचित्य साधून कृषि विभागामार्फत समुह व गट शेतीसाठी शेतक-यांना होणारे फायदे व विविध योजनांची माहिती देणारे चित्रारुपी पोष्टर तयार करण्यात आले. या पोष्टरचे उदघाटन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी नुकतेच केले.
सामुहिक शेती करण्यासाठी पुढील प्रमाणे असून त्यामध्ये गटामध्ये सहभागी होण्यासाठी सभासद स्वतः शेतकरी असावा. गटाची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कार्यालयात आत्मा संस्थेकडे रु. 500 भरुन करावी लागेल. गटामध्ये साधारण 10 ते 15 सभासद असावे. शेतकरी गट हा एकच शेती विषयक कार्यक्रम घेणारा असावा. गटातील शेतकरी एकाच गावातील व एकाच आर्थिक स्तरावरचे असावे. गटाचे नावे बँकेत स्वतंत्रा खाते उघडावे लागेल. त्यात दर महिण्यात होणारी बचत जमा करावी लागेल व गटाचे नियमित बैठका घेणे बंधनकारक राहील.
सामुहीक शेतीचे शेतक-यांसाठी फायदे पुढील प्रमाणे असून त्यामध्ये गटात शासनाचया योजनांचा लाभ प्राधान्याने धेता येईल. गटातील सदस्यांना शेतीसाठी लागणा-या बि, बियाणे, खते, औषधी, इत्यादी स्वस्त दारात उपलब्ध होवू शकतील. गटातील सदस्यांनी शेतमालाचे संघटीतरीत्या विक्री केल्यास मालाला चांगला भाव मिळेल. गटाच्या माध्यमातून कृषि मालावर प्रक्रीया केल्यास शेतमालाचे मुल्य वाढ होवून शेतक-यांना जास्तीचा नफा मिळेल. गटातील सदस्या कडून दरमहा बचत केल्यामुळे गटाजवळ निधी उपलब्ध राहील व त्या निधीतून गटातील सदस्यांना व तातडीच्या कामासाठी तात्काळ कर्ज मिळू शकेल.
No comments:
Post a Comment