वर्धा,दि.31-विकास भवन वर्धा येथे नुकतेच (दि.22 डिसे.) विविध योजने अंतर्गत राबविण्यांत येणा-या ग्रामविजोत्पादन कार्यक्रमात भाग घेणा-या शेतक-यांची कार्यशाळा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यांत आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरीता कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. नेमाडे, जिल्हा बिज प्रमाणिकरण यंत्रणा वर्धा चे गावंडे उपस्थित होते
प्रथम गावंडे यांनी बियाणे कायदा 1966 नुसार ग्रामबिजोत्पादनाच्या सर्व कायदेशीर बाबी समजावुन सांगीतल्या व ग्रामबिजोत्पादक शेतक-यांनी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काय कार्य करावयास पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. नेमाडे यांनी ग्रामबिजोत्पादन घेताना शेतक-यांनी कोणकोणत्या तांत्रिक बाबी लक्षात घ्यावयास पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेवटी कृषि विभागामार्फत ग्रामबिजोत्पादक शेतक-यांना रुपये 1000 प्रति क्विंटल बियाणे उत्पादनावर अनुदान देत असल्याचे व सन 2011-12 मध्ये प्रायोगिक तत्वावर कडधान्य पिकाचे ग्रामबिजोत्पादन अंतर्गत उत्पादन झालेल्या बियाण्याला बियाणे शेतक-यांना विक्री केल्यानंतर प्रति क्विंटल रुपये 1200 विक्री अनुदान देण्यात येणार असल्याचे विषद केले. तसेच जिल्ह्यात ग्रामबिजोत्पादना अंतर्गत कार्यरत पाच गटांना बियाणे प्रक्रीया युनिट 50 टक्के अनुदानावर देण्याचे नियेाजन असल्याचे सांगीतले.
कार्यशाळेला 80 ग्रामबिजोत्पादक व 50 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत 27 शेतक-यांना ग्रामबिजोत्पादनासाठी रुपये 95 लक्ष 8 हजार रुपयाचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेत सन 2010-11 वर्षात हरबरा पिकाचे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतक-यांना अनुदानाचे धनादेशाचे वाटप भाऊसाहेब ब-हाटे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे संचालन धर्माधिकारी यांनी केले.
No comments:
Post a Comment