वर्धा,दि.28- कृषि विभाग जिल्हा परिषद वर्धा मार्फत अनु.जाती व नवबौध्द शेतक-यांचे शासकीय योजने अंतर्गत तसेच खाजगी सिंचन विहीरीवर विद्युत कनेक्शन व विद्युत पंप 100% अनुदानावर वाटपाच्या योजनेस मंजुरी मिळाली असुन, सदर योजना मार्च 2012 पर्यत पुर्ण करावयाचे आहे. त्या करिता अनुदानाची मर्यादा रु 50,000/- आहे.
या योजने करिता पात्र लाभार्थी निवडीचा प्राधान्य क्रमानूसार रोजगार हमी योजना अंतर्गत जवाहर विहिरी, रोजगार हमी योजना म.ग्रा.रो.ह.यो. तसेच अनु.जाती/नवबौध्द शेतक-यांना विहिर पुर्ण बांधुन देण्यात आलेली आहे व विहिरीस पुरेशे पाणी आहे. असे लाभार्थी (ज्यात महिला लाभार्थींना प्रथम प्राधान्य) कृषि विभागामार्फत अनु.जाती उपयोजना अंतर्गत बांधुन दिलेल्या विहिरी. अनुसूचित जातीच्या खाजगी मालकीची विहिरी. विदर्भ विभागातील शेतकरी पॅकेज अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरी यांचा समावेश आहे.
योजनेचा लाभ घेवु इच्छीणा-या शेतक-यांनी तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment