वर्धा, दि. 30- विकास भवन वर्धा येथे दि. 22 डिसेंबर 2011 रोजी कृषि अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात कार्यरत जिल्हा कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांकरीता शेतक-यांना शेती भावाचे अंदाजबाबत जागृती या विषयावर कार्यशाळा आयेाजीत केली होती.
कार्यशाळेत डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक ए.एस.टिंगरे यांनी पिकाचे पेरणीपूर्वी व पिकाचे काढणीपूर्वी प्रत्येक शेत मालाचे भावाचा अंदाज कसा काढण्यात येतो याबाबत सविस्तर माहिती दिली व काढलेल्या अंदाजीत भावाची माहिती विद्यापीठामार्फत सर्व दैनिक वृत्तपत्रात प्रसिध्द करत असल्याचे सांगीतले. विद्यापीठामार्फत जाहीर होणारे पुढील 5-6 महिन्याचे अंदाजीत भाव काढण्याचे काम मागील 4 वर्षापासून सुरु असून विद्यापीठाने वर्तविलेले अंदाजे भाव व प्रत्यक्ष त्या -त्या महिन्यात असलेले बाजारभाव जवळपास 90 टक्के बरोबर येत असल्यामुळे विद्यापीठाकडून जाहीर होणारे पूर्व अंदाजीत भावाचे भरवशावर शेतक-यांनी शेतमाल केव्हा विकावा म्हणजे मालाला जास्तीत जास्त भाव मिळेल याची माहिती कृषि विभागामार्फत शेतक-यांपर्यंत पोहचविण्यात यावे असे आवाहन केले.
या कार्यशाळेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी सांगितले की विद्यापिठाने प्रत्येक अंदाजाचे वेळी शेतकी विभागचे ई-मेल वर माहिती टाकल्यास विभगामार्फत अंदाजीत भाव शेतक-यापर्यंत पोहचविण्याचे काम कृषि विभागामार्फत करण्यात येईल.
कार्यशाळेला कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment