Wednesday 6 July 2011

शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण मदती करीता पात्र


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.306  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------
          शेतकरी आत्महत्या एक प्रकरण
                 मदती करीता पात्र
     वर्धा, दि. 6-शेतकरी आत्महत्या प्रकरणाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण सर्वानूमते मदतीस पात्र ठरले.
     यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुनिल राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उप पोलीस अधिक्षक (गृह) नळे, समिती सदस्य सोहम पंड्या, कृषि भुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, जिल्हा कृषि अधिक्षक सि.एस.बराते उपस्थित होते.
     या बैठकीत तीन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी चौकशीचे एक प्रकरण गजानन बावने यांचा प्रलंबीत कृषि अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्यांचे प्रकरण मदतीस पात्र ठरविण्यात आले आहे.
     नापिकी, कर्जबाजारीपणा, व तगादा हे शासनाचे निकष पूर्ण करीत नसल्याने शेतकरी आत्महत्याची दोनप्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे.
                        000000



No comments:

Post a Comment