मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांचे हस्ते बक्षिस वितरण
वर्धा,
दि.2, (जिमाका) महात्मा गांधींचे विचार आणि मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने 29 सप्टेंबर ते
2 ऑक्टोंबर पर्यंत कार्यांजली उत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाच्या आज
शेवटच्या दिवशी शांती दौड मॅराथॉन स्पर्धेचे आयेाजन करण्यात
आले. मॅराथॉन स्पर्धेतील प्रथम , व्दितीय, तृतीय
क्रमांकाच्या विजेत्यांना वित्त , नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सेवाग्राम येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी
खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश
नवाल , जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली उपस्थित होते.
आज सकाळी सकाळी 7.30 वाजता जिल्हा
क्रिडा संकुल येथून मॅराथॉन स्पर्धेला खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक
बसवराज तेली यांनी हिरवी झेंडी दाखवून
प्रारंभ केला. मॅराथॉन स्पर्धेमध्ये पाच जिल्हयातील 2 हजार 800 स्पर्धक सहभागी
झाले असून स्पर्धा खुला पुरुष व महिला, शालेय मुले व मुली व प्रौढ 45 वर्षावरील
युवकांसाठी स्पर्धा आयेाजित करण्यात आली. स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली असून
प्रत्येक गटातील सहा विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. यामध्ये प्रथम 10 हजार ते 1
हजार , दुस-या गटात 6 हजार ते 1 हजार व तिस-या गटात 4 हजार ते 1 हजार असे सहा
बक्षिसे मान्यवराचे हस्ते प्रदान करण्यात आली.
00000
No comments:
Post a Comment