Tuesday 2 October 2018











महात्मा गांधी यांच्या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प करावा
n  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
       वर्धा, दि 2 :- महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व शांतता या बाबतचे  विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
            महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती अभियान निमित्त महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल,जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आश्रमातील विविध विभागांना भेट  दिली. चरख्यावर सूत कताई केली. यानंतर यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या गांधी पॅनोरमा-2018 फील्म फेस्टीवलचे उद्घाटन येथेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि सेवाग्राम डेव्हलपमेंट प्लॅन कमिटी यांचेतर्फे आयोजित सेवाग्राम कार्यांजली उत्सव यामध्ये यशस्वी विविध संघांना पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते पारीतोषीके प्रदान करण्यात आली. चरखागृह, सेवाग्राम रोड येथे नियोजन विभाग व सेवाग्राम विकास आराखडा यांचेतर्फे आयोजित जगातील सर्वांत मोठया चरखा मांडणी शिल्पाचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांचे विचार सर्वांसाठीच सदैव प्रेरणादायी आहे.महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व शांतता या संदेशाचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. महात्मा गांधी यांचे शांतता व  अहिंसेबाबतचे  विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन वर्धा येथुन याचा प्रारंभ होत आहे. हे नक्कीच गौरवास्पद असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्ष कृती आणि कार्यांतून समाजापर्यंत पोहचविण्यासाठी सेवाग्राम कार्यांजली उत्सवाचे 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले. याअंतर्गंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शांतता दौड, खादी वेशभुषा प्रदर्शन, लघुपट प्रदर्शन तसेच विविध समजाप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्वंच कार्यक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व महात्मा गांधी यांचे विचार  विविध माध्यमातून समाजापर्यंत पोहचविले.
00000

No comments:

Post a Comment