Tuesday 2 October 2018







देशाला दिशा देणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख निर्माण व्हावी.
                                                           -  सुधीर मुनगंटीवार
   *जिल्हाधिकारी कार्यालय भूमिपूजन व  उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण
   * भूमिपूजनाचा मान महिला कर्मचाऱयांना * वर्धा नगर परिषदच्या विकास कामांचे ई- भूमिपूजन
वर्धा दि 2 जिमाका :- वर्धा हा महात्मा गांधींचा जिल्हा;  सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक, जातीविहिन व धर्मविहिन समाजाचे प्रतीक म्हणून  पुढे यावा . तसेच  महात्मा गांधींचा चरखा हा भूकमुक्त, शोषणमुक्त ,नक्षलमुक्त भारतीय समाजाचे  प्रतीक म्हणून जगाच्या समोर येऊन देशातील 712 जिल्ह्यांना दिशा देणारा जिल्हा  म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प आज महात्मा गांधींच्या जयंती निमित्त करावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
     नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवनाचे भूमिपूजन, उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण आणि वर्धा नगर परिषदमधील विविध विकास कामांचे  भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्री मुनगंटीवार बोलत होते.यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अधीक्षक अभियंता श्रीमती  साखरवाडे,  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगर परिषदच्या विविध विकास कामांचे ई- भूमिपूजन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
      गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांचा विचार जण मना पर्यंत पोहचविण्याचे काम करायला हवे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासारखी इमारत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिन, दुर्बल, शोषित ,पीडितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करावे, असे श्री मुनगंटीवार म्हणाले.  सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे कार्यालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री यांनी येथील कर्मचा-यांनी निर्जीव हृदयाने काम करू नये असेही सांगितले. पारदर्शकतेसोबतच माणुसकीची झालर या कार्यालयाला लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम  एक -दीड वर्षात  पूर्ण करावे . वाघाच्या हस्ते या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असून वाघाच्या गतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      देशाच्या आंदोलनाची दिशाभूमी आणि महात्मा गांधीच्या कर्मभूमीने या देशाला कर्म करण्याची प्रेरणा दिली. मात्र सत्यातून सत्तेकडे गेलेला हा विचार पुन्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेतून सत्याकडे आणला आहे.  15 वर्षांपूर्वी केलेल्या घोषणा या शासनाने पूर्ण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सत्याच्या रस्त्यावर चालून बोलू तेच करण्याचा संकल्प त्यांनी केला. 
इमारतीचे भूमिपूजन महिला कर्मचा-यांच्या  हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवन च्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कुसुम वाघ या महिला कर्मचार्याला   भूमीपुजन करण्यास सांगितले. कामाचे श्रेय घेणे आणि मानपान यासाठी रुसवे भूगवे होताना नेहमीच बघतो. मात्र पालकमंत्री यांनी कनिष्ठ वरिष्ठ हा भेद संपवून त्याच कार्यालयात काम करणा-या  महिला कर्मचा-याला भूमीपूजनाचा मान देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
      यावेळी खासदार तडस म्हणाले,  चरख्याच्या माध्यममातून गांधीजींचा श्रम, समानता आणि शांती चा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहचवता येईल. या शासनाच्या काळात 7 राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले. विदर्भाचा विकास या माध्यमातून होईल. प्रधानमत्री आवास योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील घरांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीतील तफावत थांबवून सर्वाना साडेतीन लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताविकातून इमारतीची वैशिष्ट्ये सांगून ही नवीन इमारत पारदर्शक, गतीने सेवाभाव ठेवून काम करणारी राहील असे सांगितले.
      यावेळी आमदार पंकज भोयर यांनी पालकमंत्री यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला असे सांगून विकासकामांची यादी सांगितली. समाधान शिबिराच्या माध्यमातून 50 हजार लोकांच्या तक्रारी निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली.  यावेळी आमदार समीर कुणावर यांनीही मनोगत व्यक्त केले.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते वास्तू विशारद किशोर चिद्दलवार आणि यश सराफ यांचा सत्कार करण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या  चरख्याच्या  प्रतिकृतीची निर्मिती करणारे जे. जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्राध्यापक विजय सकपाळ आणि विजय बोनदर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटामार्फत निर्मित पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अतुल रासपायले, आणि आभार अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले.
43 कोटी 11 लक्ष 8 हजार रुपये खर्च  करुन बांधण्यात येणा-या जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालयाची इमारत दोन मजली राहणार आहे.  इमारतीचे बांधकाम  10 हजार 281 चौ. मीटरमध्ये करण्यात येणार असून नागपूरच्या मे. विजय कंस्ट्रक्शन कपंनीच्या माध्यमाने इमारतीचे बांधकाम 15 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यावरण पुरक इमारतीचे बांधकाम होणार आहे. यामध्ये सौर उर्जा चलित वातानुकूलित , पर्यावरण घटकाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्थापत्य शैलीचा पुरेपूर वापर करुन भारतीय राजमुद्रा तथा चिन्हांचा अंतर्भाव असणार आहे. अशा प्रकारची जिल्हाधिकारी कार्यालयाची नविन इमारत असणार आहे.  
            38 कोटी 9 लक्ष 79 हजार रुपये खर्च करुन 1 हजार 712 चौ.मी. क्षेत्रात बांधण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाची इमारत दोन मजली असून तळमजल्यावर तहसिल कार्यालय व पहिल्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय बांधण्यात आले आहे.
                                                                                    00000

No comments:

Post a Comment