Friday 18 May 2018





7 हजार 589 बेरोजगारांनी सुरू केला व्यवसाय
        प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 111 कोटीचे कर्ज वाटप.

वर्धा दि 17 (जिमाका):-  बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली. स्वत:ची व कुटुंबाची आर्थीक परिस्थिती बदलण्यासाठी बेरोजगारांनी याचा अतिशय उत्तम फायदा  घेतला असून अनेकांनी उद्योग- व्यवसाय सुरू केला आहे.  जिल्ह्यात या योजनेतून 2017- 18 या आर्थिक वर्षात 7 हजार 589 तरुणांना कर्ज पुरवठा करण्यात आला असून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना  लाखो बेरोजगारांना नोक-या देणे शासनाला शक्य नाही. त्यामुळे स्वयंरोजगराला चालना देण्यासाठी शासनाने उद्योग- व्यवसाय करू इच्छीणा-या  तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले.  व्यवसाय उभारण्यासाठी लागणारे भांडवल  विना तारण मिळण्यासाठी केंद्र शासनाने  प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. 
राज्य शासनाने या योजनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात होण्यासाठी जिल्हास्तरीय प्रचार, प्रसार समन्वय समिती गठीत केली. या समितीच्या सहकार्याने  विविध माध्यमांचा उपायोग करून योजनेचा दोन वर्षांपासून प्रचार- प्रसार करण्यात येत आहे. मागील वर्षी महिला बचत गटाचे  8 मेळावे, आणि यावर्षी आय टी आय प्रशिक्षित व प्रमोद महाजन  कौशल्य प्राप्त युवक व युवतीचे 8 आणि महिलांचे 8 असे 16  मेळावे, बस पॅनल, प्रवासी निवा-यावर फोम सीट, मुद्रा माहिती पुस्तिका, तहसील कार्यालयात स्क्रोलर, जिल्ह्यात होर्डिंग वर फ्लेक्स, इत्यादींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसिद्धी करण्यात आली. यामुळे तरुणांना या योजनेची संपूर्ण माहिती मिळून अनेक युवकांनी स्वयंरोजगार करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला.या योजनेत  शिशु 10 ते 50 हजार, किशोर 50 हजार ते 5 लाख आणि तरुण  गटात 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मागील आर्थिक वर्षात शिशु गटात  4 हजार 262  तरुणांना  व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 कोटी 36 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
किशोर गटात सर्वाधिक कर्ज वाटप झाले असून 52 कोटी 96 लक्ष रुपये 2 हजार 779 बेरोजगारांना व्यवसाय उभारणे व त्यात वाढ करण्यासाठी देण्यात आले आहेत.
तसेच तरुण गटात 5 ते 10 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून 548 बेरोजगारांना 45 कोटी 59 लक्ष रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून तिन्ही गटात यावर्षी 110 कोटी 91 लक्ष रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
सर्वाधिक कर्ज पुरवठा भारतीय स्टेट बँकेकडून
         प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतुन कर्ज पुरवठा करणार-या राष्ट्रीयकृत,खाजगी आणि ग्रामीण बँकांमध्ये सर्वाधिक कर्ज पुरवठा भारतीय स्टेट बँकेने केला आहे. या बँकेने 789  बेरोजगारांना 27 कोटी 3 लक्ष रुपयांचा  कर्ज पुरवठा केला आहे.  तर बँक ऑफ इंडिया ने 908 बेरोजगारांना 11 कोटी 29 लाख रुपयांचे  व कर्ज वाटप केले आहे.

या योजनेचा फायदा घेऊन तरुणांनी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, सिमेंट प्रॉडक्ट , फोटो स्टुडिओ, ब्युटी पार्लर, डेली निड्स, किराणा, सोलर एनर्जी एकुईपमेंट फिटिंग, मोबाईल दुरुस्ती, दुचाकी,चारचाकी दुरुस्ती असे अनेक वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.

No comments:

Post a Comment