चित्ररथाव्दारे जलयुक्त् शिवारबाबत जनजागृती
Ø 2017-18 मधील 138 गावांमध्ये फिरतोय चित्ररथ
वर्धा ,दि.29-ग्रामीण भागात पाण्याचे महत्व
समजावून सांगणे, पाणी बचत, कमी पाण्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग तसेच पाणी अडवा
पाणी जीरवा याची माहिती पटवून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असुन याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मिळत आहे.
जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते
9 नोव्हेंबर रोजी हिरवी झेंडी दाखवून विकास भवन येथुन चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला
होता. सदर चित्ररथ आठही तालुक्यातील 138 गावांमध्ये फिरणार असुन गावक-यांना शासनाच्या
विविध योजनांची माहिती आणि शौचालयाच्या वापराबाबत सुध्दा जनजागृती करण्यात येत आहे.
8X6 फुट आकाराच्या एल.ई.डी. स्क्रीनवर विविध
लघुचित्रफीती आणि माहितीपटाच्याव्दारे नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत
47 गावांमध्ये चित्ररथ फिरविण्यात आला आहे. या चित्ररथासोबत त्या-त्या क्षेत्रातील
कृषी सहाय्यक राहत असुन तो गावातील लोकांना जलयुक्त शिवार मधील कामांबाबत माहिती देत असुन योजनांची
माहिती सुध्दा देतो. त्यामुळे उर्वरित गावातील नागरिकांनी या चित्ररथाच्या माध्यमातून
योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment