Sunday 26 November 2017



वाचनाचे संस्कार बालपणीच होणे आवश्यक
                                                                                  
- प्रदीप दाते.
-
ग्रंथोत्सवाचा समारोप
    वर्धा दि 25 (जिमाका ):- संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन महत्वाचे  आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनाचे संस्कार बालपणीच व्हावे लागतात, ते संस्कार करण्याची जबाबदारी ग्रंथालयासोबतच शिक्षकांची सुद्धा आहे असे प्रतिपादन  प्रदीप दाते यांनी केले.
ग्रंथोत्सव 2017 चा समारोप आज झाला .यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री   दाते बोलत होते. या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकार, डॉ गजानन कोटेवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ यू पी नाल्हे, जिल्हा ग्रंथपाल  अस्मिता मंडपे, सुधीर गवळी उपस्थित होते.
पुढे बोलताना दाते म्हणाले, प्रत्येकाने आपले काम आवडीने आणि झोकून देऊन केले तर चांगली पिढी तयार होईल. वाचनाची आवड आज विद्यार्थ्यांना मध्ये राहिलीच नाही. परीक्षा पद्धती ही बहूपर्यायी झाली असल्यामुळे विद्यार्थी सखोल वाचन करत नाहीत. त्यामुळे   त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता पण तरुण वर्गाचं योगदान यात दिसत नसल्याची  खंत त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी निधी वाढवून द्यावा अशी मागणी करून
  वर्धेत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते कायम  सहकार्य  देतील अशी हमी श्री दाते यांनी  दिली. 
समाजाला जोडण्यासाठी, प्रकाशक,लेखक विक्रेते आणि वाचक यांना एकत्र करण्याचे काम  शासन ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून करत आहे.  महाविद्यालयाच्या ग्रंथपालांची स्थिती चांगली आहे. मात्र सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती चिंताजनक आहे. वाचनाची भूक भागवणारी माणस आज उपाशी आहेत.  वाचनालयात अल्पशा मानधनावर काम करायला  कुणी  तयार होत नाही अशी व्यथा श्री नाल्हे यांनी मांडली .सार्वजनिक ग्रंथालयाला  शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. वाचनालये ही गावाची सांस्कृतिक ठेव आहे. त्यामुळे  सार्वजनिक ग्रंथालये आणि शालेय ग्रंथालयांची स्थिती ही महाविद्यालयीन ग्रंथालयांसारखी व्हावी, अशी आशा श्री यू पी नाल्हे  यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयांच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. ग्रंथालयांचे  अनुदान दुप्पट करण्यासाठी आपली पत, काम आणि दर्जा  दिसला पाहिजे. ग्रंथालयांच्या अवस्थेसाठी  ग्रंथालये स्वताच जबाबदार आहेत. 50 %  वाचनालये उघडलीच जात नाहीत,अशी परिस्थिती आहे. आपणही जरा ग्रंथालयांच्या कामकाजासाठी आपले योगदानाचे परीक्षण करण्याची गरज आहे.  त्यामुळे ग्रंथालयांचा गुणात्मक दर्जा वाढला पाहीजे, अशी अपेक्षा कोटेवार यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रंथोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना,
  आणि वाचनलयाना  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमामाचे संचालन श्रीमती बेलखोडे यांनी तर आभार अस्मिता मंडपे  यांनी व्यक्त केले.




No comments:

Post a Comment