वाचनातून मनुष्याचे जीवन घडत असते
-सुनिता कावळे
वर्धा,
दि. 25 : वाचनामुळे माणसाच्याच्या मेंदूवर चांगला परिणाम होऊन यातून मनुष्याचे जीवन
घडत असते. यामुळे माणुस संवेदनशील होऊन समाजाकडे
पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. असे मनोगत
सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. सुनिता कावळे यांनी व्यक्त केले.
ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशीय प्रथम सत्रात बाल
साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या.
यावेळी
यशवंत विद्यालयाच्या मुख्याद्यापिका रंजना दाते, मीनल रोहणकर, श्रीमती कोट्टेवार, विनोद
तांबे उपस्थित होते.
प्रत्येक
विद्यार्थ्यांनी बाल साहित्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे यासाठी जेष्ठ बाल साहित्यकार
यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी बाल साहित्य वाचन केल्यास बाल साहित्य संस्कृती जपली जाऊन त्यांची कथा कथन शैली विकसित होईल, असे त्या म्हणाल्या. निर्मळ मनातून निर्माण होणारे साहित्य हे खरे साहित्य
असते. विचार मंथनातून खरा बुध्दीचा विकास होतेा.
विद्यार्थ्यांनी चांगले काय व वाईट काय हा सारासार विवेक जागृत करुन ठेवला पाहिजे.
स्वत:ला स्वत: घडवावे यातून साहित्य निर्माण करावे. असे विचार सुनिता कावळे यांनी व्यक्त
केले.
विनोद
तांबे म्हणाले, आजच्या सोशन मिडियाच्या युगात बाल साहित्य हरविले आहे. यासाठी मुलांनी
बाल साहित्याची आवड निर्माण करावी. मुलांमध्ये वाचन करण्याची गरज आहे. विज्ञानाच्या
युगामध्ये मुलांचे बालपण हरविले आहे. बालपणापासुन साहित्याची आवड निर्माण होणे गरजेचे
आहे.
यावेळी
बाल साहित्यकारांनी स्वरचीत कथा, कवितेचे कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना दाते यांनी तर संचालन
साक्षी रामटेके या विद्यार्थींनीने केले.
No comments:
Post a Comment