ग्रामपंचायत निवडणूक : नामनिर्देशनपत्रासोबत
जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील
वर्धा, दि.1 –वर्धा
जिल्ह्यात नवनिर्मित 7 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व 35 ग्रामपंचायतींच्या
पोट निवडणुका दिनांक 17 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार
सार्वत्रिक व पोट निवडणूकांसाठी दिनांक 2 एप्रिल 2016 रोजी नामनिर्देशन स्वीकारण्याचा
शेवटचा दिवस असून वेळ दुपारी 3 वाजेऐवजी शेवटची वेळ सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये
नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाची जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करुन
नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पावती किंवा अन्य कोणताही पुरावा
सादर करावा.
तसेच उमेदवार निवडून आल्याचे
घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचे मुदतीत पडताळणी समितीने दिलेले
वैधता प्रमाणपत्र सादर करेल, याबाबतचे हमीपत्र नामनिर्देशक पत्रासोबत सादर करावे
लागेल. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे सदस्य पद रद्द
ठरेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा
ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment