लोकशाही दिनातील तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करा
- दीपक नलवडे
Ø नवीन 5 तक्रारी दाखल, जुन्या तक्रारींचाही घेतला आढावा
वर्धा,दिनांक 04 – लोकशाही दिनात दाखल होणा-या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींसंदर्भात विभागप्रमुखांनी तत्काळ चौकशी करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांना त्वरीत माहिती उपलब्ध करून तक्रारीचा निपटारा करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी आज अधिका-यांना दिल्यात.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातून आलेल्या तक्रारी अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सर्व विभागांचे प्रमुख, महसूल अधिकारी आदींची उपस्थिती होती.
जमीन मोजणी, नोंदणी, नकाशा दुरूस्ती, अतिक्रमण आदी विषयांवर लोकशाही दिनामध्ये नवीन पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या. नवीन तक्रारीसह जुन्या तक्रारींबाबत तत्काळ कार्यवाही करून संबंधित तक्रारदाराला त्या प्रकरणाबाबत कळवावे, असेही त्यांनी सांगितले.
*******
No comments:
Post a Comment