Saturday 5 November 2011

संत रविदास पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

                          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.5/11/2011
-------------------------------------------------------------------
       संत रविदास पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
      वर्धा, दि.5- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अनुषंगाने संत रविदास पुरस्कार ही योजना लागु केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातून एक व्यक्ती व एका संस्थेस हा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. सन 2011-12 करीता पुरस्कारासाठी इच्छूक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थाकडून मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2011 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे.
     पुरस्कारा अंतर्गत व्यक्तीसाठी सन्मानपत्र व रोख रुपये 21000 आणि सामाजिक संस्थेसाठी सन्मानपत्र व रोख रुपये 30001 असे आहे. व्यक्तीसाठी पुरस्कार मिळण्यासाठी अर्जदार व्यक्ती चर्मकार अथवा दलित समाजातील सामाजिक दूर्बल घटकाच्या कल्याणासाठी किमान 15 वर्षापासून कार्यरत असावे. अर्जदाराचे वय पुरुषांसाठी किमान 50 वर्षे व महिलासाठी किमान 40 वर्षे इतके असावे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वय शिथील करण्याचे अधिकार शासनास आहेत. कोणत्याही व्यक्तीस अथवा संस्थेस एकादाच पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कार मिळण्यासाठी जात. धर्म, लिंग व क्षेत्र यांचे बंधन नाही. पुरस्कारासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा इतर कोणत्याही पदाधिका-यास अर्ज करता येणार नाही.
     सामाजिक संस्थासाठी पुरस्कार मिळण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. समाज कल्याण क्षेत्रामध्ये किमान 10 वर्षे सामाजिक कार्य असावे. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. पुरस्कारासाठी जात, धर्म, पंथ व क्षेत्र याचा विचार केला जाणार नाही.
     व्यक्ती व सामाजिक संस्थांनी अश्या अटी व शर्ती पुर्ण करीत असल्यास विहीत नमून्यातील अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2011 पूर्वी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड, वर्धा येथील कार्यालयात सादर करावे. व अधिक माहितीसाठी  दुरध्वनी क्रमांक 07152-243331 वर संपर्क साधावा.
                                000000

No comments:

Post a Comment