Tuesday 1 November 2011

महात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम मोठया थाटात शुभारंभ शेतक-यांना आर्थिक दृष्टया समृध्द करावे - मुख्यमंत्री धुमल


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.1नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------

वर्धा, दि.1: विदर्भात शेतीला सिंचनाची अपूरी जोड असल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्टया डबघाईला आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शेतक-यांच्या शेतीला सिंचनाची पूरेशी व्यवस्था झाल्यास त्यांना शेतीतून भरघोष असे उत्पन्न मिळेल व तो आर्थिक दृष्टया समृध्द होईल असा विश्वास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी व्यक्त केला.
पूर्ती उघोग समुहव्दारा संचालीत महात्मा शुगर अन्ड पॉवर लिमीटेड जामणी ता.सेलू येथे महात्मा साखर कारखान्याचा गळीत हंगामाच्या शुभारंभ मोठया थाटात आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल व राज्यसभा विरोधी पक्ष नेते अरुण जेटली व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्यसभेचे खासदार पियुष गोयल, आमदार दादाराव केचे,  सुर्यप्रकाश साही,  डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, जि.प.सदस्य मिलिंद भेंडे, अरुण अडसड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांना मुलभुत सोयी पुरविल्यास भविष्यांत त्यांची प्रगतीकडे वाटचाल होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री धुमल म्हणाले की, शेतक-यांच्या हिताचे नवनविन उपक्रम पूर्ती उद्योग समुहाने राबविले असून याचा लाभ शेतक-यांनी घेतल्यास त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये निश्चितपणे बदल घडून येईल असेही ते म्हणाले.
राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरुण जेटली म्हणाले की, विदर्भाचा शेतकरी हालाखीचे जीवण जगत असून त्यांनी पूर्ती उद्योग समुहाचे नवनविन तंत्रज्ञान आत्म्सात करुन अनूदानांवर साहित्याची खरेदी केल्यास शेतक-यांना आर्थिक प्रगती सोबत उज्वल भविष्याकडे वाटचाल करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी पुर्ती उद्योग समुहाव्दारे  शेतक-यांच्या हिताचे करण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देवून भविष्यांत शेतक-यांच्या जीवनांत आनंदाची पर्वणी येईल असे निर्णय घेण्यांत येतील असे ते म्हणाले.
यावेळी आमदार दादाराव केचे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांनी उसाचा गठ्ठा संयत्रात टाकून साखर गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कृषी प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी केले तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विजय मुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरांतून मोठया संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment