Thursday 1 September 2011

जिल्ह्यातील सात जलाशये 100 टक्के भरलेले


                          महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.455             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.1 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.1 -वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 1 सप्टेंबर 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,सात जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
     धाम प्रकल्प महाकाली जलाशय 98393 टक्के,बोर प्रकल्प 92.49 टक्के,डोंगरगाव पंचधारा व मदन उन्नई,लाल नाला प्रकल्प,पोथरा प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के, मदन प्रकल्प 84.60 टक्के, नांद प्रकल्प 94.74 टक्के, वडगाव प्रकल्प 96.91 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 92.51 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 6.08 टक्के, बेंबाळा प्रकल्प 39.93 टक्के भरलेले आहेत.
     पोथरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 84 सें.मी.ने 309.43 क्युमेक्स, डोंगरगांव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 1.73 क्युमेक्स , पंचधारा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 2.44 क्युमेक्स, मदन उन्नई धरणाच्या सांडव्यावरुन 5 सें.मी.ने 3.11 क्युमेक्स, वर्धा कार नदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 16 से.मी.ने 26.16क्युमेक्स व सुकळी लघू प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी.ने 4.32 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
     वडगाव प्रकल्पाचे 5 व्दार 25 से.मी. ने उघडले असून, त्यातून 120.79 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. उर्ध्व वर्धा धरणातून 11 व्दारे 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 175 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. निम्न वर्धा धरणाचे 30 व्दारे 40 से.मी. ने उघडले असून, त्यातून 516 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. बेंबाळा प्रकल्पाचे 2 व्दार 5 से.मी. ने उघडले असून, त्यातून 4.32 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.

No comments:

Post a Comment