Tuesday 30 August 2011

जिल्ह्यातील सहा जलाशये 100 टक्के भरलेले


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.30ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.30-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक        30 ऑगस्ट 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,सहा जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
     धाम प्रकल्प महाकाली जलाशय 86.73 टक्के,बोर प्रकल्प 94.02 टक्के,डोंगरगाव पंचधारा व मदन उन्नई,पोथरा प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के, मदन प्रकल्प 80.12 टक्के, लाल नाला प्रकल्प 88.71 टक्के, नांद प्रकल्प 47.87 टक्के, वडगाव प्रकल्प 93.79 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 92.21 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 6.08 टक्के, बेंबाळा प्रकल्प 38.46 टक्के व सुकळी लघु प्रकल्प 100 टक्के भरलेले आहेत.
     पोथरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 19 सें.मी.ने 33.28 क्युसेस, डोंगरगांव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 1.73 क्युसेस , पंचधारा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 2.44 क्युसेस, मदन उन्नई धरणाच्या सांडव्यावरुन 5 सें.मी.ने 3.11 क्युसेस, वर्धा कार नदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 15 से.मी.ने 21.68 क्युसेस व सुकळी लघू प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 1 से.मी.ने 0.38 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
     वडगाव प्रकल्पाचे 3 व्दार 25 से.मी. ने उघडले असून, त्यातून 71.58 पाण्याचा विसर्ग होत आहे. उर्ध्व वर्धा धरणातून 11 व्दारे 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 270 घ.मीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. निम्न वर्धा धरणाचे 30 व्दारे 20 से.मी. ने उघडले असून, त्यातून 262 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. बेंबाळा प्रकल्पाचे    2 व्दार 5 से.मी. ने उघडले असून, त्यातून 9.60 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.
                            00000

No comments:

Post a Comment