चिमुकले निघाले
दिल्ली वारीला
वर्धा, दि.5 (जिमाका),
ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहयचे त्याच बालवयात
वर्धा जिल्हयातील जिल्हा परिषदांच्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी आणि राष्ट्रपती भवनास भेट देण्यास निघाले,
हे स्वप्न् नाही तर वास्तव आहे.
महात्मा गांधी यांची
150 वी जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासुन मुल्यसंस्कार रुजवसाठी
उडान प्रकल्प जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची प्रेरणा
व संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी
विचार परिषद, नई तालीम सेवाग्राम यांच्या सहकार्यातून गेल्या वर्षीपासुन सार्थक जीवनासाठी मुल्यशिक्षण हा उपक्रम राबविला
जात आहे. या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम , उपक्रम, व स्पर्धा यांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व अभिव्यक्तींला चालना दिली जात आहे. मुलांचा उत्सफुर्त
प्रतिसाद व शिक्षकांचे उत्तम मागदर्शन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.
शाळा, केंद्र, तालुका
असे टप्पे पार करुन 21 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय उडाण ही सामान्यज्ञान परीक्षा नई
तालीम सेवाग्राम येथे पार पडली . या सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्हयातील इयत्ता 5 ते
9 पर्यंतचे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते. या सहभागी विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी गुणवत्तेत
चमकले. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यात आपली चुणुक दाखविली. जिल्हाधिकारी
यांनी जाहिर केल्या प्रमाणे स्पर्धेत गुणवत्तेत चमकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमान
वारीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती भवनास भेट देण्याची संधी प्राप्त झाली आहे. 7 डिसेंबर
रोजी विमानात बसण्याचे या बालकांचे स्वप्न
पूर्णत्वास जाणार आहे. दिल्ली येथे गांधीजीचे वास्तव्य असलेली ठिकाणे, त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांना भेट दुऊन तेथुन गांधी विचारांची प्रेरणा घेतील तसेच या वारीत
ते राष्ट्रपती भवनास भेट देतील. जिल्हाधिकारी
व मुख्यकार्यकारी अधिका-यांसह अनेक मान्यवरांनी हया चिमुकल्यांच्या दिल्ली वारीला शुभेच्छा
दिलेल्या आहेत. 7 डिसेंबरला 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातुन या चिमुकल्यांची
गाडी रवाना होईल.
0000
No comments:
Post a Comment