शेतकरी आत्महत्येची 16 प्रकरणे पात्र
वर्धा
दि 23- शेतकरी आत्महत्या प्रकरणाची जिल्हास्तरीय समितीची सभा आज समितीचे
अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत एकुण 28 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे ठेवण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार समितीचे अध्यक्ष
यांनी सर्वानुमते 16 प्रकरणे पात्र ठरविले. तर 10 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले.
आणि 2 प्रकरणे फेरतपासणीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कडे पाठविण्यात
आले.
बैठकीला जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक,जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, केमचे प्रतिनिधी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.
विनोद वाघमारे, कारंजा पंचायत समितीच्या सभापती पंचायत समितीचे सभापती मंगेश
खवशी, देवळी पंचायत समितीच्या सभापती विद्या भुजाडे उपस्थित होते.
0000
भगतसिंग,
राजगुरु व सुखदेव यांना विनम्र अभिवादन
वर्धा
दि 23-जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी
शैलेश नवाल यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज शहिद दिनी त्यांच्या
फोटोला हारअर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment