Friday 24 March 2017



समृध्‍दी महामार्गाची पारपडली पर्यावरण  जनसुनावणीत
     वर्धा दि 23- नागपूर-मुंबई समृध्‍दी महामार्ग प्रकल्‍पात बाधित  क्षेत्रातील 56 हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे हे नुकसान  1 लाख 6 हजार वृक्ष लावगवड करुन भरुन काढले जाईल. यामुळे प्रकल्‍पाचा पर्यावरणावर प्रदुषणाचा परिणाम होणार नसल्‍याचे महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावनीत शेतक-यांना सांगितले.
नागपूर-मुबंई प्रस्‍तावित महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाच्‍या पॅकेज 1 मधील नागपूर ते पिंपळगाव (वर्धा) दरम्‍यानच्‍या प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांसाठी   पर्यावरण विषयक जनसुनावणीचे  आज विकास भवन येथे  आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी यांचे अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली. यावेळी महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस व पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे उपस्थित होते.
 यावेळी प्रकल्‍पातील रस्‍त्‍याच्‍या बांधकामात होणारी वृक्षतोड  व पर्यावरण विषयी इतर बाबीची शेतक-यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्‍तर देतांना नरेंद्र टोपे म्‍हणाले, प्रकल्‍पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्‍प भागात हवेतील गुणवत्‍ता, ध्‍वनीचे पातळी, पाण्‍याची व मातीची गुणवत्‍ता विचारात घेतली जाणार आहे. प्रकल्‍पामुळे पर्यावरणाचा होणारा दुष्‍परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्‍यात येणार आहे. तसेच जमिनीची होणारी धूप कमी करण्‍यासाठी उपाययोजना करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पाच्‍या बांधकामात वापरण्‍यात येणारी वाहने प्रदुषण मुक्‍त प्रमाणीत झाल्‍याशिवाय वापरण्‍यात येणार नाही. कोणत्‍याही नैसर्गिक पाण्‍याच्‍या प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे केल्‍या जाणार आहे. असे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी उपस्थित शेतक-यांना सांगितले.
यावेळी प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांनी भूसंचयन तसेच भूचयनात शेतीच्‍या मोबदला विषयी तक्रारी मांडल्‍या. रस्‍ते विकास महामंडळाचे अधिकारी,  जनसुनावणीला मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
                                                0000


No comments:

Post a Comment