अतिवृष्टीच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज
वर्धा, दि 9:- हवामान विभागाने विदर्भात 10 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर वर्धा जिल्ह्यात काल 24 तासात सेलू वगळता सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 गेट आज सकाळी 9 वाजता 20 सेमी ने उघडले असून धरणातून 424 दश लक्ष घनमीटर पाण्याचा
विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभीमिवर जिल्हा प्रशासन सज्ज
असून सर्व प्राशसकीय यंत्रनानी सतर्क रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी
शैलेश नवाल यांनी दिल्या आहेत.
पावसामुळे अंशता वर्धा
तालुका पडलेली घरे 46, हिंगणघाट 23 हमदापुर
येथे भिंत पडून 1 बकरी दगावली 2 जखमी झाली
आहे.
काल 24 तासात झालेला जिल्हानिहाय
पाऊस असा वर्धा 83.06, सेलू 56.0,देवळी 78.0, कारंजा 82.06,आष्टी 76.04,आर्वी 105.0,हिंगणघाट 160.02,समुद्रपुर 100.02 एकूण 742.0 सरासरी 92.75 इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला एकुण पाऊस 3316.23 मी.मी असून
त्याची सरासरी 414.53 मी.मी एवढी आहे.
काल संध्याकाळ पासून निम्न
वर्धा धरणाचे 31 ही गेट उघडण्यात आले. धरणाची पातळी आज सकाळी 12 वाजेपर्यंत 279.94 मी एवढी होती.
धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नादिकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून नागरिकांनी संकटकाळात नियंत्रण कक्षाशी 243446 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment