पाणी बचतीच्या संदेशासाठी वर्धेकरांची पदयात्रा
Ø
खासदार रामदास तडस यांनी दाखविली झेंडी
Ø
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा
Ø
जलसंपदा विभागाचा उपक्रम, लायन्स क्लबचाही सहभाग
वर्धा, दिनांक 20 – पाणी हेच जीवन, पाण्याचा
वापर जपून करा, पाण्याची बचत करा… जल है
तो कल है… आदी घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जलजागृती सप्ताहानिमित्त काढण्यात
आलेल्या पदयात्रेतून वर्धेकरांनी संदेश देण्यात आला. या पदयात्रेला हिरवी झेंडी खासदार
रामदास तडस यांनी दाखविली. यावेळी त्यांनी पाण्याचा काटकसरीने
वापर करण्याचे आवाहन केले. पदयात्रेचा समारोप आमदार डॉ.
पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनीही विभागाच्या
कार्याचे कौतूक करून जनतेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
जलसंपदा विभागामार्फत
वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला
खासदार रामदास तडस यांनी अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला
झेंडी दाखविली. पदयात्रेत भजनी मंडळासह, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
दिनांक 16 ते
22 मार्चपर्यंत साजरा करण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त
पदयात्रेतून पाणी बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहचावा. पाण्याची
बचत व्हावी, या उद्देशाने आज, दिनांक
20 रोजी शहरातून पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेची
सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात
आली. पदयात्रेत भजनी मंडळासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बजाज चौक, शिवाजी चौक
मार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या
उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी त्यांनी मराठवाड्यासह
राज्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी बचत ही काळाची
गरज बनली असून प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी खासदार रामदास तडस यांचा वृक्ष देऊन जलसंपदा विभागामार्फत
वृक्ष सत्कार करण्यात आला. या पदयात्रा कार्यक्रमास जिल्हा पोलिस उपअधीक्षक
आर.जी. किल्लेकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सामाजिक
कार्यकर्ते रमेश केला, लॉयन्स क्लबचे अभिषेक बेद,अनिल नरेडी, ओमकार गावंडे, जलसंपदा
विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता शंकर
मंडवार, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार,
श्री.ढवळे, उपकार्यकारी अभियंता
विजय नाखले, सुनील दोशी, श्री. देशमुख, सहायक अभियंता राजू बोडेकर, गणेश
गोडे, लेखाधिकारी प्रदीप शेंदरे, इमरान
राही, इरफान शेख, सुहास पाटील आदींची उपस्थिती
होती. जलसंपदा विभागामार्फत मान्यवरांना वृक्ष भेट देऊन स्वागत
करण्यात आले. आभार श्री. रब्बेवार यांनी
मानले.
000000
No comments:
Post a Comment