यशवंत पंचायत राज अभियान वर्धा जिल्हा परिषद विभागात प्रथम
Ø राज्यपालांच्या उपस्थितीत विशेष गौरव
वर्धा, दिनांक 21 – यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत नागपूर विभागात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्धा जिल्हा परिषदेला सलग दुस-यांदा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यपाल सी.
विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव समारंभात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांनी ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याहस्ते मुंबई येथे एका शानदार समारंभात स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले आहे.
वर्धा जिल्हा परिषदेने कामकाज या सदरात सभांचे आयोजन अभिलेख्यांचे वर्गीकरण पारीत झालेले ठराव आमसभा स्थायी व विषय समित्यांचे कामकाज या सोबतच कर्मचारी व्यवस्थापन व क्षमता वर्धन यामध्ये प्रशिक्षण तक्रारींचे निवारण निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा तसेच जिल्हा परिषदांच्या उत्पन्नांचे नियोजन नवीन स्त्रोत निर्माण करणे आदी उल्लेखनीय कार्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची भौतिक व आर्थिक उद्दीष्ट पूर्ती अनुसूचित जाती, जमाती व महिलांच्या विकासासाठी दिलेला खर्च नागरी सुविधांची निर्मिती हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन नागपूर विभागात सर्वाधिक 75 गुण मिळवून अ अधिक श्रेणी प्राप्त केली आहे.
यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जमा खर्चाची लेखे, लेखा परीक्षण मुद्दे, तक्रारीचे निराकरण, माहिती अधिकार अर्जाची पुर्तता करण्यासोबतच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या वापराबाबत पुढाकार तसेच विभागीय व राज्यस्तरावरील पारितोषिके आदींचा समावेश आहे.
75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणा-या जिल्हा परिषदांना अ अधिक दर्जा देऊन गौरव करण्यात येत आहे.
ग्रामविकास विभागातर्फे या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या संस्थांचा गौरव करण्यात येतो. वर्धा जिल्हा परिषदेला विभागातील पहिला पुरस्कार ग्राम विकास व जलसंधारण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे व ग्रामविकास राज्य मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व्ही.
गिरीराज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
000000
No comments:
Post a Comment