जल स्वावलंबनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
-
रामदास तडस
Ø जलजागृती सप्ताहाचा थाटात समारोप
Ø विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण
Ø निसर्ग सेवा समितीच्यावतीने हुतात्मा स्मारकात कार्यक्रम
वर्धा, दिनांक 22 – पाणी हेच जीवन असून प्रत्येकाने पाणी वाचविण्याचा संकल्प करून कर्तव्य पार पाडावे. पाणी टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेता सर्वांच्याच उज्ज्व्ल भवितव्यासाठी प्रत्येकाने जल स्वावलंबनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीही सर्वांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
विकास भवन येथे जलजागृती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत दळवी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, श्री. ढवळे, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार, जिल्हा परिषद सदस्य अविनाश देव उपस्थित होते.
खासदार रामदास तडस म्हणाले, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून निम्न वर्धा प्रकल्पास पंतप्रधान सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतले आहे.
या प्रकल्पापासून 66 हजार हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने या भागातील शेतकरी सुजलाम्, सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने 2017 पर्यंत पूर्णत्वास येईल,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जल
स्वावलंबनासाठी
सर्वांनी पुढाकार घ्यावा (पान एकवरून)
जलसंपदा विभागातील अधिका-यांनीही हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास नेऊन शेतक-यांना दिलासा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केली.
या प्रकल्पामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पादन वाढवून तो स्वयंपूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक केले. तसेच या पुढेही लोकांमध्ये पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी व जलसमृद्धीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सप्ताहाच्या माध्यमातूनही जागृती निर्माण झाली आहे. पाण्याची बचत काळाची गरज असून प्रत्येकाने पाण्याच्या संवर्धनासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन पाण्याची बचत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विभागाच्यावतीने जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रज्वल साटोने, अपेक्षा तडस, प्रवेश गोंडाने, वक्तृत्व स्पर्धेत संजिवनी बकाने, अवंतिका लुंगे, आरती बाळबुधे, निखील डफरे, निबंध स्पर्धेत संकेत इंगोले, मानवी काकडे, प्रचिती महल्ले यांचा समावेश होता. तसेच सप्ताहात सर्वोत्तम कामगिरी करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचाही यावेळी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थी निखील डफरे याने यावेळी मनोगत व्यक्त केले.
पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ लिपिक लता डोंगरे यांनी तयार केलेल्या सिंचनगंगा चित्रकथेचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात आले. तसेच श्री.
बोडेकर यांनी सप्ताहांतर्गत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे पॉवरपॉइंटद्वारे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
‘हुतात्मा स्मारकाचा परिसर दत्तक घेणार’
जागतिक
जल दिनाचे औचित्य साधून सेवाग्राम परिसरातील हुतात्मा स्मारकात सकाळी 9.30 वाजता
खासदार रामदास तडस यांच्याहस्ते जलजागृती सप्ताहाचा समारोप व बा-कस्तुरबा गांधी व
महादेवभाई देसाई स्मृती हुतात्मा स्मारकाच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण खासदार
रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सेवाग्राम आश्रमाचे सचिव श्रीराम
जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, सेवाग्रामच्या
सरपंच रोशनाताई जामलेकर, मुरूडचे सरपंच वासुदेव देवडे यांच्या उपस्थितीत जलजागृती
सप्ताहाचा समारोप व बा-कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई स्मृती हुतात्मा
स्मारकाच्या संरक्षक भिंतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.
खासदार रामदास तडस यांनी प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी
पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच हुतात्मा स्मारकात लवकरच बोअरवेल, मोटार व
संरक्षण भिंत, हायमास्ट या सुविधा देण्यात येऊन हा परिसरच दत्तक घेणार असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी मराठवाड्याची पाणी
परिस्थिती दयनीय आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे ओढवू नये याकरीता वृक्षारोपण,
पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. निसर्ग सेवा समितीचे कार्य कौतुकास्पद आहे.
निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत सन्मानचिन्ह, वृक्ष देऊन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे
यांचाही सत्कार करण्यात आला.
सरपंच श्रीमती जामलेकर यांनीही
विचार व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते जलसंस्कृतीचे प्रतीक म्हणून कलशाचे
पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग सेवा समितीचे
अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी केले. यावेळी जलप्रतिज्ञा म्हणण्यात
आली. राष्ट्रवंदनने कार्यक्रमांची
सांगता झाली.
कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. जांगडा, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक
प्रवीणकुमार बडगे, प्रा. मोहन गुजरकर,
पीपल्स फॉर ॲनिमलचे आशीष गोस्वामी, पंतजली योग
समितीचे दामोदर राऊत, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम् पंड्या,
इमरान राही, डॉ. सोमवंशी,
रमेश केला, श्री. हांडे,
श्री. येंडे, रवी गुप्ता,
हेमचंद्र वैद्य, आशीष पोहाने, उपअभियंता श्री. मून, श्री.
जाधव आदींची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment