जलजागृती सप्ताहानिमित्त आज उमरी मेघेत जलसाहित्य संमेलन
Ø पाणी पुरवठा विभागामार्फत आयोजन
Ø जलसाहित्य संमेलनासह विविध जनजागृतीपर कार्यक्रम
Ø लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा
वर्धा, दिनांक 18– जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने शनिवार, दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता उमरी मेघे येथे पाणी पुरवठ्याचे उद्भवाजवळ जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या आराखड्यातील निवडक 422 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल,
जलतज्ञ माधव कोटस्थाने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा व जलसाहित्य संमलनाचे उद्घाटन होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी सांगितले.
दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी तसेच पाण्याबाबत योग्य व्यवस्थापन, जलसाक्षर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 58 ग्रामपंचायतीमध्ये सप्ताहकालावधीत 24 तास पाणीपुरवठा आणि मीटर बसविण्याबाबत ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. पाणी टंचाई आराखड्यातील 60 ग्रामपंचायतींनाही पाणी बचतीवर ग्रामसभेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच 422 ग्रामपंचायतीत जलदिंडी, निवडक ग्रामपंचायतीत पाऊस पाणी संकलन वॉल पेंटिंग, पाणी बचतीचे संदेश रंगविणे आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले आहे.
0000
No comments:
Post a Comment