आपले सरकार वेब पोर्टलवर
जनतेच्या 43 तक्रारी
Ø तक्रार निवारण प्रणालीच्या
जनतेकडून वापर
Ø शासन दरबारी आपले प्रश्न
मांडण्यासाठी व्यासपीठ
Ø 22 तक्रारी संदर्भात कार्यवाही
पूर्ण
Ø तक्रारीसंदर्भात आपले मत मोडण्याचा
अधिकार
वर्धा, दि.17 - आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीद्वारे जनतेला
आपल्या तक्रारी थेट शासनाकडे पाठविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठाचा
वापर वर्धा जिल्ह्यातील 43 नागरिकांनी केला आहे. प्रशासनातर्फे संगणकीकृत प्रणालीद्वारे
प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेवून सोडविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आपले
सरकार तक्रार निवारण प्रणालीची सुरुवात 26 जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आपले गा-हाणी थेट प्रशासनाकडे मांडता
यावे यासाठी आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये जनतेच्या
थेट तक्रारी, माहितीचा अधिकार शासनाला सूचना, सेवा हक्क अधिनियम व ऑनलाईन पद्धतीचे
व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. https://grievances.maharashtra.gov.in तसेच applesarkar.maharashtra.gov.in आपल्या सूचना तक्रारी थेट मांडण्याची
सुविधा उपलब्ध झाली आहे.
महसूल,
जिल्हा परिषद व जिल्हा पोलिस अधीक्षक या कार्यालया संदर्भातील तक्रारी ऑनलाईन
करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊन एकूण 43 तक्रारी थेट दाखल केल्या आहेत. यामध्ये
महसूल प्रशासना संदर्भातील 28 तक्रारी, जिल्हा परिषद 12 तर पोलिस विभागाशी
संबंधित तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ऑनलाईन
पद्धतीने दाखल झालेल्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलिल नियमित आढावा
घेत आहेत. संबंधित विभागाकडे तक्रार वर्ग करुन तक्रारी संदर्भात कार्यवाहीची
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तक्रार दाखल मोबाईलवर एसएमएसद्वारे तक्रारी संदर्भात
माहिती देण्यात येते.
महसूल
विभागात प्राप्त झालेल्या 28 तक्रारीमध्ये भूसुधार, गृह, आस्थापना, नगर
पालिका, निवडणुका, भूसंपादन, राज्य वीज वितरण कंपनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना तसेच उपसहनिबंधक
याचे संदर्भातील तक्रारीचा समावेश आहे. प्राप्त झालेला तक्रारीपैकी 14 तक्रारी
निकाली काढण्यात आल्या आहेत. 14 विभागाकडे वर्ककरुन कार्यवाही करण्याच्या
सूचना दिल्या आहेत.
जिल्हा
परिषदेकडे 12 तक्रारीपैकी 8 तक्रारीसंदर्भात निर्णय देण्यात आला आहे तर 4 संबंधित
विभागाला निर्णयासाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य,
पशुसंवर्धन, ग्रामपंचायत ग्रामीण, पाणी पुरवठा आदी विभागाशी संबंधित आहेत.
प्रशासना
संदर्भात जनतेच्या तक्रारी अथवा गा-हाणी असल्यास त्या सोडविण्यासाठी जनतेनी
आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष
सलिल यांनी केली आहे.
0000000
No comments:
Post a Comment