सातारामध्ये
राज्यस्तरीय वक्तृत्त्व, प्रश्नमंजूषा स्पर्धा
वर्धा, दि.2 - महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीतर्फे दिनांक
21 ते 23 जानेवारी कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा
आणि दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा
स्पर्धांचे यशवंतराव चव्हाण इस्टिंट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजन केलेले
आहे.
या स्पर्धांची माहितीपत्रके रयत शिक्षण संस्थेच्या
www.rayatshikshan.edu व www.erayat.org या संकेतस्थळावर
उपलब्ध आहेत. माहितीपत्रकात स्पर्धेविषयीचे नियम अटी व तपशील देण्यात आलेला आहे.
स्पर्धांच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख वक्तृत्व स्पर्धेसाठी
दिनांक 16 जानेवारी असून प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दिनांक 5 जानेवारी आहे. स्पर्धेकांनी
अधिक माहितीसाठी सातारा येथील कर्मवीर विद्या प्रबोधिनी (फोन नं. 02162-2310074)
या वर संपर्क साधावा, असे संस्थांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment