Thursday 18 October 2012

रासायनीक खत नियंत्रण प्रणाली पायलट प्रोजेक्‍टसाठी देशात वर्धेची निवड


           
                                                 
                       *  खतावरील सबसीडी थेट शेतक-यांच्‍या बँक खात्‍यात
                *  किसान क्रेडीट कार्ड आधारशी जोडणार
                       
            वर्धा,दि. 18 - रासायनीक खतांवर दिले जाणारे अनुदान शेतक-यांना  थेट त्‍यांच्‍या बँकेत जमा करण्‍यासाठी  रासायनीक खत नियंत्रण प्रणाली मोबाईल हा पायलट प्रकल्‍प देशातील 10 जिल्‍ह्यामध्‍ये  राबविण्‍यात येत असून, यामध्‍ये राज्‍यातून  वर्धा जिल्‍ह्याची  निवड  करण्‍यात आली  असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
      रासायनिक खत नियंत्रण प्रणालीमध्‍ये  रासायनीक खतांवर दिले जाणारे अनुदान सरळरित्‍या  प्रथम  घाऊक व किरकोळ विक्रेत्‍यांना व त्‍यानंतर  थेट शेतक-यांना अदा केले जाणार आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील  सर्व  कृषी केन्‍द्र धारकांनी  रासायनीक खतांची माहिती  एमएफएमएस या वेबसाईडवर ऑनलाईन भरायची  आहे. या प्रणालीमुळे जिल्‍ह्यामध्‍ये प्राप्‍त होणा-या खतांची माहितीसुध्‍दा ऑनलाईन उपलब्‍ध  होणार आहे.
       रासायनीक खत नियंत्रण प्रणालीची सुरुवात जिल्‍ह्यात सुरु झाली असून, सर्व कृषी केन्‍द्र धारकांची  नोंदणी  करुन घेण्‍यात आली असून त्‍यांना पासवर्ड सुध्‍दा देण्‍यात आलेला आहे.
         केरोसीन व गॅसला मिळणारी  शासनाची सबसीडी  लाभार्थ्‍यांच्‍या  बँकेत जमा करण्‍यात येणार आहे. त्‍याचपध्‍दतीने  शेतक-यांना  दिल्‍या जाणा-या  खतांवरील अनुदानही  जमा होणार आहे. यासाठी  आरसीएफ ही खत कंपनी वर्धा जिल्‍ह्यात नोडल एजन्‍सी  म्‍हणून काम करणार आहे. रासायनीक खत नियंत्रण प्रणाली वर्धा जिल्‍ह्यात  100 टक्‍के राबविण्‍यासाठी  विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जे.सी. भुतडा यांनी  आवाहन केले आहे. आरसीएफचे  हेमंत दाभट यांनी  या प्रणालीबाबत यावेळी  अधिका-यांना मार्गदर्शन केले.
         शेतक-यांना  किसान क्रेडीटकार्ड देण्‍यात येणार असून, आधार कार्डाशी संलग्‍न करण्‍यात येणार असल्‍यामुळे  शेतक-यांनी  आधारकार्ड  काढावे आणि या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही यावेळी करण्‍यात आले.
       रासायनीक खत नियंत्रण प्रणालीमध्‍ये खतांवर मिळणारे अनुदान शेतक-यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये  जमा होणार आहे त्‍यामुळे जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे व यासोबत  किसान  क्रेडीटकार्ड  काढावे. ज्‍या शेतक-यांनी किसानकार्ड व आधारकार्ड  तयार केले नाहीत त्‍यांना रासायनीक खत मिळण्‍यास अडचण होईल त्‍यामुळे शेतक-यांनी  प्राधान्‍याने आधारकार्ड व किसानकार्ड काढावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
     यावेळी  जिल्‍हा अधिक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक श्री. मशानकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. डाबरे, सर्व खत कंपन्‍यांचे प्रतीनिधी, घाऊक व किरकोळ खत विक्रेते, पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                                            0000000

No comments:

Post a Comment