वर्धा, दि.21- आर्वी उपविभागातील कारंजा
तालुक्यात बोंदडठाणा, धर्ती, एकांबा, नरसिंगपुर, रानवाडी ,सेलगाव, सुसुंद्रा व
ठाणेगाव या भागात कापुस पिकावर पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भावामुळे आर्थिक
नुकसान पातळीचे जवळ आढळलेला आहे. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांनी पुढील
प्रमाणे उपाययोजना सुचविण्यात येत आहेत.
पिकाचे वेळोवेळी बारकाईने निरीक्षण करावे,
पिकात हेक्टरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावे. कपाशी भोवती मका, चवळी, झेंडू व
एरंडी या सापळा पिकांची पेरणी करावी. सोबतच निंबोळी तेल 50 मिली अथवा डायमेथोईट 30
ईसी. 10 मिली किंवा असिटामेप्रिड 20 टक्के 4 ग्रॅम अथवा अॅसिफट 75 टक्के 20
ग्रॅम अथवा ट्रायझोफॉस 40 टक्के 20 मिली यापैकी कोणती एक औषध 10 लिटर पाण्यात
मिसळुन फवारावे. गरजेनुसार 8-10 दिवसाचे अंतराने वरील शिफारस केलेले अन्य
किटकनाशकाची फवारणी करावी.
ढगाळ वातावरणात फवरणी करताना स्टिकर 2 मिली
लिटर पाण्यात मिसळावे. फवारणी शक्यतो वारा स्थिर असताना, सकाळी लवकर वा
उशिरा दुपारनंतर करावी. पानाचे खालचे
भागात व बांधावरही फवारणी करावी. पॉवर पंप वापरताना कीटकनाशक मात्रा 2.5 ते 3 पट
ठेवावी.
शेतकरी बांधवांनी तातडीने सुचविलेल्या
उपाययोजना कराव्यात व गाव पातळीवर सविस्तर मार्गदर्शनासाठी कृषि सहाय्यक , किड
सर्वेक्षक यांना संपर्क साधावा असे आवाहन आर्वीचे उपविभागीय कृषी अधिकारी मुकुंद
येवले यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment