24 सप्टेंबर पर्यंत तक्रारी स्विकारणार
वर्धा,
दि. 21 – भारतीय डाक विभाग, वर्धा व्दारा दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजी अधिक्षक
डाकघर, वर्धा यांचे कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली
आहे.
पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे सहा आठवड्याचे आत निराकरण झाले
नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालत मध्ये दखल घेतल्या
जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व
मनी ऑर्डर संबंधीच्या तक्रारी विचारात
घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व
तपशीलासह केलेला असावा.
संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार
अधिक्षक डाकघर वर्धा विभाग यांचे नावे दिनांक 24 सप्टेंबर 2012 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या
तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रार कर्त्यांना डाक अदालतसाठी स्वखर्चाने
उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक डाकघर, वर्धाविभाग, वर्धा कळवितात.
000000
No comments:
Post a Comment