Saturday 2 June 2012

निर्मल कार्यालय अभियान राबविणार - मालीनी शंकर


              
वर्धा,दि.2–संपूर्ण राज्‍यात निर्मल ग्राम ही संकल्‍पना प्रत्‍येक ग्रामीण भागात राबविली जात आहे. जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी शासकीय इमारतीचे बांधकाम शासन करीत असते त्‍यामध्‍ये शौचालय सुध्‍दा अंतर्भूत असतात. या सौचालयाची स्‍वच्‍छता करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक कार्यालयावर देण्‍यात येणार असून, त्‍यासाठी  निर्मल कार्यालय अभियान राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती पाणी पुरवठा आणि स्‍वच्‍छता  विभागाच्‍या प्रधान सचिव मालीनी शंकर यांनी दिली.
      जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आज विविध विकास कामाची आढावा बेठक संपन्‍न झाली त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जि.प.मुख्‍यकार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, प्रकल्‍प  अधिकारी बि.एम.मोहन, जिल्‍हा  कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, उपजिल्‍हाधिकारी जे.बि.संगितराव व पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग, न.पा.चे मुख्‍याधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
      ग्रामस्‍थ लोकांनी  मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन निर्मल ग्राम अभियान यशस्‍वी झाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील कार्यालयामध्‍ये निर्मल अभियान राबवून स्‍वच्‍छता निर्माण करण्‍यात येणार असल्‍याचे  सांगून त्‍या म्‍हणाल्‍या की, महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्‍ये जिल्‍ह्यात सुरु असलेली कामे समाधानकारक असून, त्‍यामध्‍ये पांदन रस्‍ते, नाला सरळीकरण, विहीरी, शेततळे व पाणी अडवा पाणी जिरवा आदि कामे अंतर्भूत आहेत. यावेळी त्‍यांनी सिंचनाचे ओलीत क्षेत्र, विद्यूत विभागाने विहीरीवर बसविलेल्‍या  मोटारपंपाला विज जोडणी, खरीप हंगामात घेण्‍यात येणा-या पिकाची माहिती, शेतक-यांना देण्‍यात येणारे कर्ज, ग्रामपंचायतीची पणी पट्टी कराची वसूली, टंचाई परिस्थिती  निवारण करण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या  उपाय योजना, पाण्‍याची स्‍त्रोत बळकटीकरण तसेच पाण्‍याची तपासणी संबधाने आढावा घेवून संबधित अधिका-यांकडून  माहिती जाणून घेतली.
     यावेळी संबधित खातेप्रमुख उपस्थित होते.
                                                              000000

No comments:

Post a Comment