Friday 1 June 2012

नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळामध्‍ये समन्‍वय ठेवण्‍यात यावा - जिल्‍हाधिकारी


     वर्धा,दि.1– पावसाळ्यामध्‍ये नदी व नाल्‍यांना पुर येण्‍याची शक्‍यता असते तसेच  धरणामधील पाण्‍याची पातळी वाढल्‍यामुळे अनेक वेळा पाणी सोडल्‍या जाते. परिणामी नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसतो. या काळात संबधित यंत्राणेने दक्षत बाळगण्‍याची गरज असून नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळामध्‍ये अधिका-यांनी  समन्‍वय ठेवण्‍याची आवश्‍यकता आहे असे आवाहन जिलहाधिकारी जयश्री भोज यांनी केली.
आज मान्‍सुन पूर्व तयारीची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न  झाली. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगितराव, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय  अधिकारी उमेश काळे, उपविभागीय अधिकारी  सुनिल कलोडे, तहसिलदार सुषांत बन्‍सोड, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे, जिलहा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व इतर संबधित अधिकारी उपस्थित होते.
गाव,तालुका व जिल्‍हासतरावर नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश देवून जिलहाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, जिल्‍ह्यातील नदी व नाल्‍या काठावरील गावामध्‍ये पुर परिस्थिती निर्माण  झाल्‍यास ती परिस्थिती नियंत्रीत करण्‍यासाठी बचाव व शोध पथकांची तातडीने स्‍थापना करण्‍यात यावी तसेच त्‍यांना प्रशिक्षण सुध्‍दा देण्‍यात यावे. शहरी भागातील तसेच ग्रामीण क्षेत्रातील नाल्‍यामध्‍ये तुडूंब असलेला घनकचरा तातडीने साफ करुन त्‍याची विल्‍हेवाट सुध्‍दा लावण्‍यात यावी. शहरी  भागातील मोडकळीस आलेलया इमारतीचे तातडीने सवेक्षण करण्‍यात यावे. मंडळ स्‍तरावर बसविण्‍यता आलेले पर्जण्‍यमापक यंत्रे सुस्थित आहेत अथवा नाही याची शहानिशा करावी. पावसाळ्यामध्‍ये तलाठी, ग्रामसेवक, विद्युत  विभागाचे कर्मचारी तसेच कृषि विभागाचे कर्मचारी  यांना मुख्‍यालयात राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात याव्‍या. धरणामध्‍ये क्षमतेएवढाच पाणी साचण्‍याची साठवणूक करण्‍यात यावे. अतिरीक्‍त पाणी साठा क्रमाक्रमाने धरणामधून सोडण्‍यात यावे.  त्‍यामुळे नदी काठावरील गावाचे होणा-या  पिकाची वित्‍तीय हानी  नुकसान टाळण्‍यात येईल. पिकाचे नुकसानाचे सर्वेक्षण करताना तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागातील कर्मचा-यांनी समन्‍वय  ठेवून अचूक आकडेवारी प्रशासनाला सादर करावी. नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळात घडलेल्‍या घटनेची माहिती आपल्‍या वरिष्‍ठांना  देवून ती माहिती प्रशासनाला ताडीने कळवावी.
  पुरपरिस्‍थीती मध्‍ये  येणारी गावे अगोदरच निश्चित करुन त्‍या गावाची   सविस्‍तर माहिती तयार ठेवावी. तसेच अतिवृष्‍टीमुळे होणारे नुकसान तातडीने प्रशासनाला कळवावे. तसेच पुरपरिस्थितीमुळे उदभवणा-या समस्‍येबाबत  मदत पोहचविण्‍याचे कार्य तातडीने करावे.  तसेच संदेश वहन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याची दक्षता घ्‍यावी. पावसाळ्यामध्‍ये रोग प्रतिबंधक उपाय योजण्‍यासाठी आवश्‍यक तो औषधीचा साठा आरोग्‍य केंद्रात उपलब्‍ध करुन वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना मुख्‍यालयी राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात याव्‍यात.
  यावेळी महसूल विभाग, आरोग्‍य विभाग, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
                                                            00000000

No comments:

Post a Comment