Tuesday 10 April 2012

जिल्‍ह्यात 37(1) आणि 3 कलम जारी


         वर्धा, दि.11- जिल्‍ह्यात  शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री  भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)  आणि 3 कलम लागू केले आहे.
        या कलमाचा अंमल दि. 21 एप्रिल 2012  च्‍या रात्री  12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द  कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
                                                  0000000

No comments:

Post a Comment