वर्धा,दि.13- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 2011 या कॅलेंडर वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडिया, माहिती व जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी, वृत्तपत्र व छायाचित्रकार, छायाचित्रकार असे पाच गट या स्पर्धेसाठी असतील. सन 2011 या वर्षापासून पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून 41 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2011 चे माहिती पत्रक / अर्जाचे नमुने सर्व विभागीय माहिती कार्यालयास व सर्व जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत.
प्रवेशिका पाठविण्याची अंतीम तारीख 30 एप्रिल 2012 अशी राहील. तरी पत्रकारिता व छायाचित्रकार क्षेत्रात कार्यरत लोकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment