वर्धा,दि.22- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे वतीने 23 आणि 24 फेब्रुवारी 2012 रोजी नयी तालीम केंद्र, सेवाग्राम आश्रम येथे बुनियादी शिक्षण आणि बाल हक्क या विषयावर राष्ट्रस्तरीय कार्यशाळा आयोजित करत आली आहे.
नयी तालिम किंवा बुनियादी शिक्षण हे हस्तकला व्दारे शिक्षण प्रदान करणारे मानले जाते, ही अवधारणा महात्मा गांधी यांनी 1937 साली प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली. शिक्षणाच्या आवश्यकतेची अवधारणा आहे. जी सत्य प्रेम किंवा जीवनाची विविध कार्यशैली याशी निगडीत आहे. सर्वांगिण विकास तसेच मस्तिष्कचे सर्वांगिण विकास होईल ही अवधारणा नयी तालिमची आहे. शारिरीक श्रमाव्दारे शिक्षण मिळणे हे बालहक्काच्या विरोधात जाते का ? या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजनाचा हेतू आहे.
कार्यक्रम सुचिनुसार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10.45 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन, सकाळी 11 ते 11.45 या वेळेत पहिले सत्रात बुनियादी शिक्षणाचे ऐतिहासिक रुपरेखा व विकास. दुपारी 12 ते 12.45 व्दितीय सत्रात 21 व्या शतकामधील नयी तालीम व बुनियादी शिक्षणाचे महत्व . दुपारी 12.45 ते 1.30 वाजता तीस-या सत्रात बाल अधिकाराच्या संदर्भामधील बुनियादी शिक्षण व आधुनिक शिक्षण यांचा तुलनात्मक अभ्यास तसेच आधुनिक शिक्षण पध्दती. दुपारी 2 ते 2.45 या चौथे सत्रात बुनियादी शिक्षा / नवी तालीम याची अवधारणा व अंमलबजावणी. दुपारी 3 ते 3.45 वाजता पाचवे सत्रामध्ये विविध अधिनियम व नियमाखाली दिलेले बालकांचे हक्क व त्याची अंमलबजावणी तसेच ऐतिहासिक अवधारणा. 3.45 ते 4.30 वाजता सहाव्या सत्रामध्ये शारिरीक श्रमाचे महत्व तसेच प्राचीन अर्वाचीन शिक्षणाचे संदर्भात (सुत कताई, विणकाम, गोसेवा व शेती इत्यादी संदर्भात. दुपारी 4.30 ते 5.15 वाजता सातवे सत्रामध्ये आधुनिक जीवन पध्दती व कुटूंबाचे विघटन, बालकांच्या हक्काचे संरक्षणाचे संदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. संध्याकाळी दक्षिण मध्य सांस्कृतीक केन्द्राच्या वतीने लोककलेचे कार्यक्रम सादर होतील.
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 वाजता आनंद निकेतन अवलोकन भेट, सकाळी 10 ते 10.15 वाजता खुली चर्चा, दुपारी 11.30 ते 1.30 वाजता सामुहिक विचार विनिमय, भविष्य कालीन कार्यक्रम व दुपारी 2 ते 2.45 वाजता सादरीकरण होईल.
या कार्यशाळेत प्रमुख वक्त म्हणून न्या . चंद्रशेखर धर्माधिकारी, वर्धेचे डॉ. अनिल फरसोल, सुषमा शर्मा, करुणा फुटाणे, नसीम, पश्चिम बंगालचे प्रसाददास गुप्ता , हरिपाद महातो, अहमदाबादचे सुखदेव पटेल, डॉ. राजेंद्र खिमानी, भावनगरचे फाल्गून न शेठ, नागपूरचे डॉ. निलिनी मिसळ, दिल्लीच्या गिता धर्मपाल, तामिळनाडूचे एस.कुलंदयस्वामी व डॉ. सी. शेबगवली, पुण्याचे सुर्यकांत कुळकर्णी, दिल्लीचे ओ.पी. दुबे, डॉ. इश्वरदयाल व सुनिल इक्का आदि वक्ते कार्यशाळेला मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना.त्रिपाठी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment