Friday 27 August 2021

 

.प्र..क्र- 618                                                                               दि.27.8.2021

महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनेसाठी शेतकऱ्यांचे अर्ज आमंत्रित

प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी अर्ज करता येणार

      वर्धा दि. 27 (जिमाका):-  सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व  सिंचन सुविधा साधने या बाबीसाठी इच्छुक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱयांनी महाडीबीटी पोर्टलवर 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्याक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हे.क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी. शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी दिनांक 30 ऑगष्ट,20212ते सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल. याची नोंद घ्यावी.

बियाणे वितरण:-

  हरभरा प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतील वाणास रु.25  प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु. 12 - प्रति किलो,  रब्बी ज्वारी 10 वर्षाआतील वाणास रु.30 प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु.15 प्रति किलो. एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतक-याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येईल.

पीक प्रात्याक्षिके:-

हरभरा,करडई व रब्बी ज्वारी  पीक प्रात्याक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममुलद्रव्ये,भु सुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठांसाठी शेतक-याला 1 एकरच्या मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येणार असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतक-यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे.

000000

.प्र.प.क्र- 619                                                            दि.27.8.2021                                                                  

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन.    

     वर्धा दि. 27 (जिमाका):-  सोयाबीन या पिकावर मरुका या किडिचा प्रादुर्भाव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व शेगाव या दोन तालुक्यामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जिल्ह्यात अद्याप या किडीचा नोंद नाही. मात्र तरीही शेतकऱयांनी जागरूकपणे या अळीवर लक्ष ठेवणे आवश्यक असून अळी दिसून आल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

सोयाबीन उत्पादन कमी येण्याच्या विविध कारणंपैकी किडिंचा प्रादुर्भाव हे सर्वात महत्वाचे कारण आहे. सोयाबीन पिक हिरवेगात, मऊ,लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक किडी या पिकाकडे आकर्षित होतात. त्यात प्रामुख्याने तंबाखुवरील पाने खाणीर अळी (स्पेाडोप्टोरा),उंट अळी व घाटे अळी (हेलिकोव्हर्पा) या किडींचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर नुकसान करतांना आढळुन येतो.

   मरुका पॉड बोरर,बिन पॉड बोरर,मंग मॉथ किंवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही किड बहुपक्षी असून प्रामुख्याने तुर पिकास नुकसान करते. त्याच बरेाबर सोयाबीन, चवळी,मुग,उडीद व पावटा या पिंकांवर देखील या किडिचा प्रार्दुभाव आढळुन येतो.

जीवनक्रम:-

   पिक फुलो-यांच्या अवस्थेत असतांना या किडिचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. या किडीचे प्रौढ कीड तपकिरी काळसर रंगाचे असुन मध्यम बांध्याचे असतात. त्यांच्या पंखांवर पांढरे चटटे आढळतात. पतंग रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. मादी पतंग अंडी शक्यतो झाडाच्या शेंड्यांवर पुंजक्यात घालते. अंड्यांचा रंग हलका पिवळसर असून चार ते पाच दिवसांत अंडी उबतात. सदर किडिची अळी हिरवट पांढ-या रंगाची चमकदार असून तिच्या पाठीवर काळसर ठिपके असतात. त्यामुळे तिला ठिपक्यांची अळी असेही म्हणतात. अळीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असुन ती अतिशय चपळ असते व हलक्या धक्यानेही लगेचच गुंडाळलेल्या फुले कळयामधुन खाली पडते. अळीच्या पाच अवस्था असुन आठ ते चौदा दिवसात अळी अवस्था पुर्ण होते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळयांनी विणलेल्या अवस्थेत फुले, कळ्या किंवा जमिनीत आढळते. या किडीचा जीवनक्रम साधारपणे 18 ते 35 दिवसांत पुर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार:-

    प्रथम अवस्थेतील अळ्या प्रामुख्याने फुले व फुलकळ्यांवर उपजिवीका करण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक अळी साधारणत: चार ते सहा फुले प्रादुर्भावीत करते. तिस-या अवस्थेतील अळ्या ह्या शेंगावरती उपजिविका करण्यास सुरुवात करतात व पाचव्या अवस्थेतील अळ्या मोठ्या प्रमाणात शेंगांना प्रार्दुभाव करतात. तसेच अधुन मधुन पाने,शेंगाच्या देठांना व मुख्य खोडाला नुकसान करतात. विशेषत: ऑगष्ट सप्टेबर महिन्यामध्ये म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत  येण्याच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये जास्त आर्दता व मध्यम तापमान असते. अशा अनुकुल वातावरणात किडीचे प्रजनन जलद होते. जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. सदर परिस्थितीत सोयाबीनवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारा कुठल्याही किटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. परंतु तुरीवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी खालील शिफारशीत किटकनाशके उपलब्ध आहेत तरी फवारणी करीता त्यांचा अवलंब करता येईल.

फवारणीसाठी उपलब्ध रासायनिक कीटकनाशके

1)क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.50 एस.सी. किंवा 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

2) इथिऑन 50 ई.सी -    20मिली प्रति 10 लिटर पाण्यात.,

3)फ्लुबेन्डामाईड 20 डब्यु.जी. -   6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

4)थायोडिकार्ब 75 डब्ल्यू पी. -   15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

5) नोव्हॅल्युरॉन 5.25+ इन्डोक्झाकार्ब 4.50 एस.सी. 17.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

6) इन्डोक्झाकार्ब 15.80 इ.सी.-   6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

7) इन्डोक्झाकार्ब 14.50 एस.सी.-           4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. तयार करून फवारणी करावी.

 

00000

 

No comments:

Post a Comment