महाआवास
अभियानांतर्गत विभागीय पुरस्काराचे सोमवारी वितरण
राज्य
पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम
* केंद्र
पुरस्कृत आवास योजनेत गोंदिया प्रथम*
* उत्कृष्ट
तालुके व ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार*
वर्धा , दि. 27 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच
राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियान-ग्रामीण
अंतर्गत विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा गौरव समारंभ सोमवार,30 ऑगस्ट रोजी
दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये
सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक भंडारा
जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्याल्ला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये
प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडारा
यांची निवड झाली आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये
ग्रामपंचायत बोरगाव(चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगांव(साकोली) व
ग्रामपंचायत चिचूर(कुही) नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे. बांधकामासाठी कर्ज देणारी उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा
जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ, समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही
संस्थांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.
महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट
कार्याबद्दल जिल्हे, तालुके तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त श्रीमती
प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात
येणार आहे.
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र
पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया
जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी
वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका
म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व
तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील
तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांची निवड झाली
आहे. तृतीय पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील झंझाडा ग्रामप्रचायतीची निवड झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी(कारंजा),
द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी
प्रभाग संघ, अंदोरी(देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका,
द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावती तालुक्याचा समावेश आहे.
0000
.प्र.प.क्र- 617 दि.27.8.2021
4 महिन्यात
दोन लक्ष सव्वीस हजार सहाशे गरिबांना मिळाला
निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार
17
केंद्रावरून मिळतो लाभ
वर्धा दि. 27 (जिमाका) : कोरोना काळात सर्वत्र लॉक डाऊन
असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने 15 एप्रिल,2021 पासून नि:शुल्क शिवभोजन
थाळी उपलब्ध करुन दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो
2100 पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात 2 लक्ष 26 हजार 600 गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार
मिळाला आहे.
शासनाच्या
शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात दिनांक 26 जानेवारी 2020 पासून सुरु झाला. गरीब व
गरजु लोकांना स्वस्तात शिवभोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता 23 ऑगष्ट 2021 पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्याअंतर्गत
सर्व तालुके मिळुन 17 केंद्रे सुरु करण्यात आली या सर्व केंद्राला शासनाने प्रतिदिन
1600 थाळ्यांचा इंष्टांग मंजुर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजु व्यक्ती
उपाशी राहु नये, म्हणुन शासनाने 15 एप्रिल,2021
पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली.
तसेच प्रतिदिन थाळीच्या इंष्टांकात
दीड पट वाढ केली. वर्धा जिल्ह्यात सरासरी
1800 ते 2100 थाळ्यांचा लाभ गरीब,गरजु व अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरुन घेत आहे.
या
योनजेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकुण 17 केंद्रावर ह्या थाळीचा लाभ गरीब व गरजु लोक घेत
आहे. 15 एप्रिल ते 23 ऑगष्ट 2021 पर्यंत संपूर्ण
महाराष्ट्र राज्यात 2,43,00,230 (दोन कोटी त्रेचाळीस लाख) लाभार्थ्यांनी या योजनेचा
लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 17 केंद्रावरुन 2 लक्ष 26 हजार 613 एवढ्या गरीब
व गरजु लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे 17 शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे 14 ऑगष्ट 2021 पर्यतचे संपूर्ण अनुदान वितरीत करण्यात
आले आहे.
000000
.प्र.प.क्र- 618
दि.27.8.2021
महिला
व मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण व साहित्यासाठी 90 टक्के अनुदान
इच्छुक
लाभार्थ्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा
वर्धा
दि. 27 (जिमाका):- महिला व बाल कल्याण समितीकरीता
सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे प्राप्त निधीनुसार ग्रामीण भागातील मुलींना 90 टक्के अनुदानावर व्यावसायिक
व तांत्रिक प्रशिक्षण तसेच महिलांना व्यवसायासाठी 90 टक्के अनुदानावर साहित्य पुरविण्याची
योजना राबविण्यात येत आहे. यासाठी सर्वसाधारण,
अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडून 15 ऑक्टोबर,2021 पर्यंत अर्ज मागविण्यात
येत आहे.
ग्रामीण
भागातील स्त्रियांना 90 % अनुदानावर साहित्य पुरविणे (शिलाई मशिन) तसेच ग्रामीण भागातील
मुलींना व महिलांना 90 % अनुदानावर व्यावसायिक
व तांत्रीक प्रशिक्षण (शिवणकाम व फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण)
देण्यासाठी
ही योजना राबविण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीने सदर लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमध्ये
करून ती माहिती पंचायत समितीला पाठवावी. यासाठी अर्जदारांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज
करावा.
अर्जदाराचे
बी.पी.एल.चे प्रमाणपत्र तसेच तलाठी/तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. सन
2020-2021 चे वार्षीक उत्पन्न् रु. 1,20,000/- (अक्षरी एक लक्ष वीस हजार फक्त) पेक्षा
जास्त नसावे. अर्जदार ही वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. (सरपंच/सचिवाचे
प्रमाणपत्र जोडावे.) जातीचे प्रमाणपत्र तहसिलदार किवा उपविभागीय अधिका-यांचे प्रमाणपत्र
जोडावे. सदर योजनेचा लाभ, लाभार्थ्यांनी अन्य कोणत्याही विभागाकडुन/योजनेतुन घेतलेला
नसावा. लाभार्थीना साहित्य शुल्काच्या 90 % रक्कम अदा करणेत येईल. किंवा या कार्यालयाकडुन
दर निश्चितीच्या 90 % रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येईल.
शिवणकलेचे
मान्यता प्रापत संस्थेचे प्रमाणपत्र जोडावे.
लाभार्थ्यांचे
आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॅाक्स प्रत व बँकेची सिडीग स्लीप अर्जासोबत जोडावी. लाभार्थ्यांना
वस्तू व प्रशिक्षण शुल्काच्या 10% रक्कम स्वतः
भरावी लागेल.
00000
No comments:
Post a Comment