Thursday 3 January 2019








चार वर्षांत राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर
  शिक्षणमंत्री विनोद तावडे
Ø शिक्षणाची वारीचे थाटात उदघाटन
Ø  100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
Ø  गोंदिया हा शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा घोषित
Ø  राज्य शासन ओपन बोर्ड सुरू करणार
           वर्धा, दि 3 जिमाका :-  कोणतंही मुलं नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्याच्या कपाळावर नापास चा शिक्का मारतो.  विद्यार्थ्याना  कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करण म्हणजे शिक्षण अस मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे 4 वर्षात  राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात 16 व्या क्रमांकावरून 3  क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील.विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
      आज वर्धा येथिल  चरखा घर येथे आयोजित  'शिक्षणाची वारी'  या उपक्रमाचे  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती  जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर उपस्थित होते.
      राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल केल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे  स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत 1 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचा काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून यावर श्रेय शिक्षकांना जातेयं असे श्री तावडे यावेळी म्हणाले. इंगजीतून शिक्षणाला विरोध नाही हे स्पष्ट करताना ते म्हणाले की मराठी भाषा  ही डोळे असून इंग्रजी भाषा  ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय  दूरदृष्टी येणार नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
          जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची शोक्षणातील प्रगती वाढावी म्हणून स्वखर्चाने विविध उपक्रम राबविले.त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 64 हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधिंच्या च्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील 15 लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरु करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडले आहे. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
 
     यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक , विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण विषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी श्री विद्यामंदिर येथील विद्यार्थिनीने दफ्तराच्या ओझ्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्री तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास  सांगितले.
100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
       महाराष्ट आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी 13 शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात 100 शाळा सुरू करणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ  माशेलकर,  डॉ काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक सारख्या शास्त्रज्ञानी तयार केला आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.
ओपन बोर्डची स्थापना करणार
     काहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या- त्या क्षेत्रात उत्तम  करियर घडविण्यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड त्याला मदत करेल.
बालरक्षक चळवळ
      राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त जिल्हा झाला आहे असे श्री तावडे यांनी सांगितले.



         यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही वारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगाणी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा दिपकाव्य कविता संग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पार्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

      शिक्षणाची वारी मध्ये विविध शाळांचे 55 स्टॉल लावण्यात आले आहेत . 10 जिल्हे या वारीला जोडले असून 6 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर आभार  शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे यांनी  मानले.
                                                                        0000



No comments:

Post a Comment