नांदोरा गावात गावक-यांसोबत जिल्हाधिकारी
यांनी केले श्रमदान
वर्धा, दि. 10 –कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि
लिंगा (मांडकी) या गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गावक-यांनी उत्स्फुर्तपणे श्रमदानाला सुरवात केली.
काल जिल्हाधिकारी यांनी गावच्या वन तलावाची पाहणी करुन गावक-यांसोबत श्रमदान केले.
वॉटर
कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त पाणी डविण्यासाठी श्रमदान करण्याची
चुरस निर्माण झाली त्यामुळे नागरिकांसोबतच प्रशासन आणि सामाजिक संस्थाचा सहभाग वाढत
आहे. यामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नांदोरा आणि
लिंगा (मांडवी) येथे श्रमदान करुन गावक-यांना प्रोत्साहित केले.
तसेच
या गावांमध्ये मग्रारोहयोची कामे वाढावित जेणेकरुन गावक-यांना मोबदलाही मिळेल अशा सुचना
त्यांनी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिल्यात.
पिपरी
येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते शुभारंभ
करण्यात आला. 5 हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या तलावातुन 5 हजार घनमीटर गाळ काढण्यात
येणार आहे. हा तलाव जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. 8 ते 10 दिवसात
गाळ काढण्याचे कामपूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. तलावातुन निघालेला
गाळ शेतक-यांनी घेऊन जावा.असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी कारंजाचे तहसिलदार श्री.कुमावत, वनपरिक्षेत्र
अधिकारी, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment