10
ते 14 मार्च दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन
Ø शेतकरी उत्पादक गट व कंपन्यानी सहभाग नोंदवावा
Ø पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
वर्धा, दि 7,(जिमाका), कृषि
विभागाच्या वतीने शेतकरी ते ग्राहक थेट
विक्री या संकल्पनेवर आधारित 10 ते 14
मार्च या कालावधीत धान्य महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे. लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कृषि महोत्सवात शेतकरी
उत्पादक गटांनी उत्पादीत केलेल्या शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थांना महोत्सवाव्दारे
बाजारपेठ तसेच व्यासपीठ मिळून देण्यात येणार आहे. कृषि महोत्सवाचे उदघाटन राज्याचे
वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते 11
मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेला माल महोत्सवात आणावा
असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.
महोत्सवात शेतकरी उत्पादक गटांनी
तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी 250
स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्हयातील
आठही तालुक्यातील शेतक-यांनी सहभाग नोंदवावा. महोत्सवात थेट
विक्रीतून ग्राहक आणि उतपादक यांना फायदा होणार असल्याने उत्पादक गट, महिला बचत
गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी
सहभागासाठी नाव नोंदणी करावी.
शेतक-यांना पर्यायी बाजारपेठ पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. हंगामात
शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फायदा होत नाही. ग्राहकांना
मात्र चढया भावाने खरेदी करावी लागत असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड
बसतो. धान्य महोत्सवात विविध प्रकारच्या डाळी, तांदुळ, गहू, प्रक्रिया पदार्थ,
महिला बचत गटांचे घरगुती पदार्थ, नैसर्गिक पध्दतीने उत्पादित शेतमाल, हळद वइतर
मसाला , सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यात आलेले धान्य व भाजीपाला ग्राहकांना योग्य
दरात मिळणार आहे.
त्याचप्रमाणे शेतक-यांना येणा-या
हंगामातील तांत्रिक मार्गदर्शन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषि पुरक व्यवसाय,
दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीकोनातुन महोत्सवात विशेष
मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच कृषि व संलग्न विभागाचे योजनानिहाय स्टॉल
उपलब्ध होणार आहे. यशस्वी कृषि उद्योग
शेतकरी यांचे शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रक्रिया, यासाठी विशेष मार्गदर्शन
होणार आहे.
दि. 11 मार्च रोजी सायंकाळी
सांसकृतिक (डान्स स्पर्धा) कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 मार्च रोजी
सायंकाळी 6 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य रामपाल महाराज यांचे
समाजप्रबोधनपर कार्यक्रम, दि. 13 मार्च रोजी सायंकाळी स्टार इन्वेंट यांचा बहारदार
गीत गायन कार्यंक्रम होणार आहे.
धान्य महोत्सवात सहभागासाठी शेतकरी,
उत्पादक गट व इतर उत्पादक कंपनी यांनी शेतमालाचा तपशिलासह तालुका कृषि अधिकारी
किंवा प्रकल्प संचालक, आत्मा या कार्यालयात 9403230730,9403242039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून स्टॉल आरक्षण करण्यासाठी नोंदणी करावी असे,
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment