चरखा
चलानेमे श्रम है
-
उपराष्ट्रपती
वर्धा दि.25 (जिमाका)
:- चरखा चालविल्याने संपूर्ण शरीराला श्रम
होते. शरीरासाठी ही चांगली क्रिया आहे. त्याचबरोबर वस्त्रस्वावलंब होते, असे भावपूर्ण
उद्गार उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट
दिल्यानंतर काढले.
सेवाग्राम आश्रमात आगमन झाल्यानंतर श्री. नायडू यांनी बापूकुटी, बाकुटी,
आदिनिवास, आखरी निवासाला भेटी दिल्या. बाकुटी येथे भेट देऊन त्यांनी अभिप्राय नोंदविला.
त्यानंतर आदिनिवासाला भेट दिली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1926 यावर्षी
वृक्षारोपण केलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान केले. त्यांनी बापूकुटीमध्ये जाऊन प्रार्थना
केली. प्रार्थनेनंतर सेवाग्राम आश्रमाच्या वतीने सूत माळ, शाल आणि गीताई ग्रंथ देऊन
श्री. नायडू यांचे स्वागत केले. त्यानंतर
त्यांनी चरख्यावर सुतकताई केली. सुतकताई केल्यानंतर त्यांनी ‘चरखा चलानेमे श्रम भी
है. सॉलीड ॲक्टीव्हीटी है और वस्त्र स्वावलंबन भी है’ असे उत्स्फुर्त उद्गार काढले.
No comments:
Post a Comment