Tuesday 9 January 2018



नाबार्डकडून वित्‍तीय आराखडा सादर
वर्धा , दि. 9(जिमाका) नाबार्डचा सन 2018-19 चा पीक कर्ज, कृषी व कृषीत्तर कामासाठी जलस्त्रोतांचा विकास, बागायती, रेशीम, कुक्कुटपालन अशा विविध बाबींसाठी  वित्तीय आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा  जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकित जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर करण्यात आला.
पाण्याचा योग्य वापर  व व्यवस्थापन, लघुसिंचनाच्या उपयोगाकरिता 134 कोटी रुपये, ग्रामीण भागातील बाजारपेठ, गोदाम, व्यापार सुविधेकरिता 97 कोटी रुपये, पशुपालन 101 कोटी रुपये, कृषि यांत्रिकी 25 कोटी रुपये, मत्स्यव्यवसाय 4 कोटी 70 लाख रुपये, वनिकरण आणि पडिक जमिन सुधारणेकरीता 1 कोटी 1 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तर जैविक विज्ञान, वर्मी कंपोस्ट बिज उत्पादन तंत्रज्ञान, टिश्यू कल्चर ईत्यादी 3 कोटी 80 लाखाचा समावेश करण्यात आला आहे.

बँकांव्दारे प्राधान्य क्षेत्रासाठीची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहल बनसोड यांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्ज विषयक  वित्तीय आराखडा सादर केला. यामध्ये सन 2018-19 वर्षातील  लघु मध्यम उद्योगाकरीता 405 कोटी, महिला स्वयंसहायता समुह, संयुक्त देयता गटाकरीता 316 कोटी रुपयाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. ॲग्रो प्रोसेसींगसाठी 55 कोटी व शेतक-यांच्या सहकारी संस्था तसेच फेडरेशन यांच्या सुविधेकरीता 4 कोटी 80 लाख रुपयांचा आराखडयात समावेश करण्यात आला. शेतमालाचा निर्यात, ग्रामीण शिक्षण सुविधा, ग्रामीण हाऊसिंग, समाज कल्याणाच्या मुलभुत सुविधा व सोलर, प्राकृतिक उर्जासाठी 727 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच यावेळी जिल्हयाच्या वित्तपुरवठा आराखडयाच्या मार्गर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
            आराखडा सादर करतांना रिझर्व्ह बॅकेंचे श्री. मेंढे, व श्री. सिंग, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा उपनिबंधक अजय कडू तसेच बँकाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment