Tuesday 9 January 2018



हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा बनावी
           – राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी
हिंदी विश्वविद्यालयाचा 20  वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
‘हिंदी सेवी सन्मानाने’ देश विदेशातील 8साहित्यिकांचा सन्मान  
वर्धा, दि. 8  : देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदी जनमनाची भाषा व्हावी. इतर भारतीय भाषामधील बोली आणि शब्दांचा उपयोग हिंदीत केला तर ही भाषा आणखी समृद्ध होईल, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले. ते येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 20 व्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथि म्‍हणून बोलत होते.
विश्वविद्यालयचा 20 वा स्थापना दिवस मोठया उत्साह आणि उल्हासात सोमवार, 8 जानेवारी रोजी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्वचन विद्यापीठ भवनाच्‍या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. गिरीश्‍वर मिश्र होते. यावेळी खासदार रामदास तडस विशिष्ट अतिथी म्‍हणून तर  भारतीय जनसंचार संस्‍था, नवी दिल्लीचे महानिदेशक डॉ. के. जी. सुरेश मुखय वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. मनोज कुमार, प्रो. हनुमान प्रसाद शुक्‍ल, प्रो. देवराज, प्रो. एल. कारूण्यकरा मंचावर उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाच्या वतीने मालती जोशी, मध्य प्रदेश,  डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र, ओरिसा, तेजेंद्र शर्मा, लंडन, डॉ. रणजीत साहा, दिल्‍ली, डॉ. तात्‍याना ओरांसकाइया, जर्मनी, प्रो. मिलेना ब्राटोइएवा, बल्गारिया, डॉ. पी. के. बालसुब्रमण्यम, तमिळनाडु, सुरेश शर्मा, महाराष्‍ट्र यांना राज्यपालांच्या हस्ते ‘हिंदी सेवी सन्मान’ प्रदान करण्यात आला.

राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी म्हणाले की, विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमि वर्धा येथे एका दृढ़ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिद्ध करत आहे.  वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे.
       भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्लीचे महानिदेशक प्रो. के. जी. सुरेश यांनी ‘’शिक्षा का वैश्विक परिदृश्‍य और भारतीय शिक्षा प्रणाली’’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले की, हिंदी चित्रपट देश-विदेशात लोकप्रिय आहे तशी हिंदी भाषा लोकप्रिय झाली पाहिजे. व्यवसाय, व्यापार आणि कार्यालयीन उपयोगात हिंदी आणली तर ती जागतिक स्तरावर पोहचेल. त्यांनी वर्तमान शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, सरकारी प्रयास, पालकांची जबाबदारी, संशोधनाची गुणवत्ता, अल्पसंख्यक संस्थांना कायद्याच्या चौकटी बाहेर ठेवणे,  शिक्षण क्षेत्रात बढतीचे नियम तसेच गुणवत्तेचे आव्हान यावरही आपले मत मांडले. 
खासदार रामदास तडस म्हणाले की, 20 वर्षाआधी विश्वविद्यालयाचा पाया एका छोटयाशा रोपटयाने झाला जो आज 20 वर्षांनी वटवृक्षासमान विस्तारित झाला आहे. विश्वविद्यालयामुळे वर्धेचा गौरव देश-विदेशात वाढत आहे. येथील अभ्यासक्रमात भारतासह देश-विदेशातील विद्यार्थी प्रवेश घेतात. केंद्रीय विद्यालयाच्या रूपाने एक मोठी उपलब्धि विश्वविद्यालयाची म्हणता येईल. केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना वर्धेत साकारत आहे ज्यात विश्वविद्यालयाचा ही महत्वाचा वाटा आहे. नव्या पीढिला शिक्षणाच्या  माध्यमातून दिशा देण्याचे काम हे विश्वविद्यालय करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असेही ते म्हणाले. विश्वविद्यालयाच्या प्रत्येक विकास कामात माझे सहकार्य आहे आणि राहील असे आश्वासन खासदार तडस यांनी यावेळी दिले.
कुलगुरू प्रो. गिरीशवर मिश्र म्हणाले की हिंदीला समृद्ध करण्यासाठी हे विश्वविद्यालय कार्यरत आहे. विश्वविद्यालय दिवसें-दिवस क्षमता वाढवित आहे. येथील विद्यार्थी देश-दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. विश्वविद्यालय निरंतर समाजाशी आपली नाळ घट्ट करत आहे. आतापावेतो 300 हून  अधिक विद्यार्थी अध्ययनासाठी येथे आले असून निरंतर येत आहेत. यावेळी त्‍यांनी विश्वविद्यालयाचे अनेक  कार्यक्रम आणि उपक्रमांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले.    

कार्यक्रमाला विविध विद्यापीठांचे संकाय अध्यक्ष, विभागाध्यक्ष, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, गणमान्य अतिथी, पत्रकार  तथा विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रो. प्रिती सागर यांनी केले तर आभार कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोप बैंडवर राष्ट्रगिताची धून वाजवून करण्यात आला. मुखय कार्यक्रम सुरू होण्याआधी राज्यपाल महोदयांनी गांधी हिल्सवरील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केले.
                                               



No comments:

Post a Comment