Tuesday 23 February 2016

वर्धेच्या 5 निर्मलग्राम संघांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव
विभागीय महिला मेळाव्यास 5 हजार महिलांचा सहभाग
             वर्धा, दिनांक 22 – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत विभागीय महिला मेळाव्यात जिल्ह्यातील बचत गटाच्या 6 हजार महिलांनी  सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील या मेळाव्यात शौचालय बांधकाम केलेल्या पाच निर्मलग्राम संघाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला.
             जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बचत गटांच्या महिलांना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातून 6 हजार बचत गटाच्या महिलांनी उपस्थित राहून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल आपला वेगळा ठसा उमटविल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.
             निर्मलग्राम संघाच्या माध्यमातून बचतगटाच्या सदस्यांनी सुमारे 9 हजार शौचालयाचा उपयोग प्रत्यक्ष कुटुंब करत आहे. एका संघामध्ये दहा बचत गटांचा समावेश असून प्रत्येक बचत गटामध्ये 100 ते 150 महिलांचा समावेश आहे. महिला बचत गटाच्या सदस्यांनी निर्मल बचत गट ही संकल्पना राबविल्याबद्दल वाघोलीच्या (देवळी) दीपग्राम संघ, नाचणगावच्या भगिनी ग्राम संघ, पडेगाव (वर्ध्याच्या) संत गाडगेबाबा ग्राम संघ, सावंगी मेघेच्या एकता ग्राम संघ, आंतरगावच्या सृष्टी ग्राम संघ, आमगावच्या विदर्भ ग्राम संघाच्या निर्मल ग्राम संघामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करण्यात आला.
              293 युवकांना मिळाला रोजगार
बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसोबतच बचतगट कुटुंबातील युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन क्षमता वृद्धी करण्याचा विशेष कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर बचत गटातील सदस्यांना औरंगाबाद, पुणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक आस्थापनांमध्ये 293 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.
       बचतगटातील कुटुंबांना व्यावसायिक प्रशिक्षणामुळे राजणगावच्या ॲलोकान ॲटोमोबाईल, औरंगाबाचे सिपेट, तसेच नागपूरच्या साईराजइंडिया कंपन्यात सरासरीत 8 ते 10 हजार रुपयांच्या नोक-या उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment