राष्ट्रीय
महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
वर्धा, दि
18 :-( जिमाका) शहरानजीक असलेल्या नागठाणा चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरील
रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी खा.
रामदास तडस, आ.पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाचे तांत्रिक संल्लागार बी.डी. ठेंग, मुख्य प्रबंधक नरेश वडेटवार, परियोजना संचालक
प्रशांत पागृत, प्रकल्प अभियंता साहेबराव जुनघरे, वसंतराव नाल्हे, अशोक बनकर आदी
उपस्थित होते.
आज
लोकार्पण झालेल्या रेल्वे उड्डानपुलाची लांबी 1.63 किमी. इतकी आहे तर या
उड्डानपुलाच्या बांधकामासाठी 66 कोटी 20 लाख इतका खर्च झाला आहे. या
उड्डानपुलामुळे 7.40 किमीचा सालोड बायपास रहदारीसाठी पुर्णपणे सज्ज झाला आहे. यामुळे
वाहनचालकांचा 15 ते 20 मिनिटाचा वेळ वाचणार आहे.
0000000000.
No comments:
Post a Comment