प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.17-जिल्हयातील सालोड (हिरापूर) व
नेरी (पुनर्वसन ) या दोन ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित
कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र ग्रामपंचायत
(सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियमाप्रमाणे
ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्य संख्या ठरविणे व प्रारुप प्रभाग रचना करण्यात
येईल. 23 सप्टेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकारी मान्यता
देतील. 28 सप्टेंबर पर्यंत आरक्षणाची सोडत ठरविण्यात येईल. 29 सप्टेंबर पर्यंत
हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सुचना प्रसिध्द करण्यात येईल. 7 ऑक्टोंबर पर्यंत
हरकती स्विकारण्यात येतील. हरकती व सुचना
प्राप्त झाल्यावर त्यावर 18 ऑक्टोंबर पर्यंत निर्णय घेण्यात येईल. अंतिम
प्रभाग रचना, आरक्षित जागा इत्यादी तपशिल
24 ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य)
तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी एन.के.लोणकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment