वाहनांमुळे वनविभागाला चागले दिवस
-खासदार रामदास तडस
·
वर्धा,आष्टी व खरागंणासाठी गस्त वाहन
·
वाहनांमुळे शिकार व तस्करीच्या प्रमाणात होईल घट
वर्धा,दि.6- वन विभागाकडून शासनाना खुप
अपेक्षा असतात पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. म्हणूनच राज्य शासनाने वन विभागाला गस्त वाहन उपलब्ध करुन दिले आहे. या वाहनामुळे
वनविभागाला चागले दिवस आले असून यापूढे अधिक जबाबदारीने वन व वन्य प्राण्याचे
संरक्षण करावे लागेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
वन विभागाला प्राप्त झालेल्या पेट्रोलींग
गाड्याचे हस्तांतरण खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वनविभागाच्या कार्यालयात करण्यात
आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपवन संरक्षक दिंगबर पगार, जिल्हा
माहिती अधिकारी मनिषा सावळे, पिपल फॉर अॅनिमल संस्थेचे आषिश गोसावी
उपस्थित होते.
पुढे बोलतांना खासदार तडस म्हणाले एकाच
दिवशी दोन कोटी पेक्षा जास्त झाडे लावून महाराष्ट्राने देशात इतिहास रचला आहे.
या निमित्ताने वृक्षारोपनाबाबत नागरिकामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती झाली. त्यामुळे
हे अभियान लोकांचे झाले, हे याचे सर्वात मोठे यश आहे. देशाच्या लोकसभेत अनेक
चांगले निर्णय होतात. देशाचे नागरिक म्हणून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत
पोहचविण्यात आपण सहभाग द्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कर्मचा-यांना
केले.
खासदार तडस यांच्या हस्ते वर्धा, आष्टी, खरागंणा येथील वनपरिक्षेत्र
अधिका-यांना गाडीची चावी देण्यात आली.
आजपासून तीन गाड्या वन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. याबात माहिती
देताना उपवन संराक्षक दिंगबर पगार म्हणाले, वित्त मंत्री तथा पालकमात्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्हयासाठी आठ पेट्रोलींग व्हॅन उपलब्ध करून दिल्यात. वन
संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी या गाड्याचा खुप फायदा होईल. मनुष्य–प्राणी
संघर्षाच्या वेळी तात्काळ घटनास्थळी पोहचून वन्य प्राण्याला गाडीत आणता येते. प्राण्याने एखादया मनुष्यावर
हल्ला केल्यास जखमी इसमास तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी गाडीचा उपयोग होऊ
शेकतो वन संरक्षणासाठी या गाडया अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून यामुळे वन शिकार व तस्करीच्या प्रकरणात निश्चितच घट होईल
अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी,
कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.
0000
No comments:
Post a Comment